प्रतिनिधी / मडगाव
कायद्याचे पालन सर्वांनी कर्तव्य भावनेने करायचे असते. लोकायुक्तांचा अहवाल आपण अद्याप वाचलेला नाही. परंतु, लोकायुक्तांना त्यांच्या यंत्रणेकडून चौकशी करण्याचे अधिकार आहेत, असे विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी गोवा लोकायुक्तांनी राज्यपालांना दिलेल्या खाण लीज नूतनीकरणासबंधीच्या अहवालावर प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले.
‘जसे करावे तसे भरावे’ हा विधात्याचा न्याय आहे. माझ्यावर कसलेही प्रत्यक्ष आरोप नसतानाही मला ‘अग्निपरीक्षा’ देण्यास भाग पाडले गेले. सत्य कधीच लपत नाही व शेवटी सत्याचाच विजय होतो. सर्वांनी योग्य अधिकारणीसमोर आपले म्हणणे मांडणे महत्वाचे असते. सुडबुद्धीने घेतलेले निर्णय जास्त काळ टिकत नाही व सदर कृतीचा परिणाम लवकरच लोप पावतो. प्रत्येकाने कायद्याच्या चौकटीत राहूनच आपली कृती करणे योग्य असते, असे श्री. कामत यांनी म्हटले आहे.