दोन न्यायाधीशांचा समान सूर
नवी दिल्ली ः सर्वोच्च न्यायालयाच्या दोन न्यायाधीशांनी कायद्याच्या शिक्षणात तत्काळ सुधारणा घडवून आणण्याची गरज अधोरेखित केली आहे. या दोन्ही न्यायाधीशांनुसार कायदा महाविद्यालयांची संख्या प्रचंड वाढल्याने शिक्षणाच्या गुणवत्तेत मोठी घसरण झाली आहे. आम्ही आमच्या गरजांवर लक्ष न देता दरवर्षी वकिलांची फौज तयार करत आहोत. देशात अंदाधुंदपणे कायदा महाविद्यालये सुरू करण्यात आल्याने शिक्षणाचा स्तर खालावला आहे. कायद्याच्या शिक्षणात सुधारणा घडविणे ही काळाची गरज असल्याचे उद्गार न्यायाधीश एस.के. कौल यांनी काढले आहेत.
अशाच प्रकारचे विचार वरिष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी यांनीही व्यक्त केले आहेत. न्यायाधीश एन.व्ही. रमन्ना यांनी कायद्याच्या शिक्षणाची स्थिती सुधारण्यावर लक्ष देणे अत्यंत आवश्यक असल्याचे म्हटले आहे. अभिषेक मनु सिंघवी आणि प्राध्यापक खगेश गौतम यांनी लिहिलेल्या पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते.