वृत्तसंस्था / नंदिग्राम
शेतकरी नेते बलबीर सिंग राजेवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना भारतासाठी सर्वात मोठा धोका ठरविले आहे. पश्चिम बंगालच्या नंदिग्राममध्ये किसान महापंचायतमध्ये बोलताना राजेवाल यांनी देशाला पाकिस्तानपासून नव्हे तर मोदींकडून अधिक धोका असल्याचे वादग्रस्त विधान शनिवारी केले आहे.
हे सरकार केवळ मते मिळविणे जाणते. भाजपला आता मतांच्या माध्यमातून प्रहार करण्यात यावा. कुणालाही मतदान करा, पण मोदींना मत देऊ नका असे राजेवाल म्हणाले. तीन नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलन करणारे शेतकरी नेते पश्चिम बंगालसह निवडणूक होणार असलेल्या अन्य राज्यांमध्ये भाजपच्या विरोधात प्रचार करत आहेत. संयुक्त किसान मोर्चाने शनिवारी नंदिग्रामसह बंगालमधील अनेक ठिकाणी महापंचायत घेतली आहे. भाजप आणि केंद्र सरकारच्या विरोधाच्या नावार काही शेतकरी नेते सर्व मर्यादा ओलांडत आहेत.
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेस आणि भाजप यांच्यात तीव्र चुरस दिसून येत आहे. अशा स्थितीत शेतकरी नेत्यांनी भाजपच्या विरोधात राज्यात स्वतःची पूर्ण शक्ती पणाला लावली आहे. नंदिग्राममध्ये ममता बॅनर्जी आणि कधीकाळी त्यांचे घनिष्ठ सहकारी राहिलेले सुवेंदु अधिकारी यांच्यात राजकीय लढत आहे. तेथे संयुक्त किसान मोर्चाने शनिवारी महापंचायत करत भाजपला मतदान न करण्याचे आवाहन केले आहे.