रत्नागिरी-कारवांचीवाडी येथील घटना
प्रतिनिधी/ रत्नागिरी
रत्नागिरी-हातखंबा रस्त्यावरील कारवांचीवाडी येथे टाटा पुझर कारच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाल़ा ही घटना गुरूवारी रात्री 8 च्या सुमारास घडल़ी प्रसाद प्रकाश यादव (28, ऱा नाचणे, रसाळवाडी रत्नागिरी) असे अपघातातील मृताचे नाव आह़े या प्रकरणी शहर पोलिसांनी कारचालकाविरूद्ध गुन्हा दाखल केला आह़े
महेश भारत नकाते (26, ऱा पंढरपूर ज़ि सोलापूर) असे कारचालकाचे नाव आह़े या बाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रसाद यादव हा गुरूवारी रात्री दुचाकी (एमएच 09 डीके 521) घेवून कुवारबाव ते कारवांचीवाडी असा जात होत़ा दरम्यान स्वामी स्वरूपानंद वसाहत येथे समोरून येणाऱया टाटा पुझर कारने प्रसाद याच्या दुचाकीला जोरदार धडक दिल़ी या घटनेत प्रसाद हा जागीच ठार झाल़ा या घटनेची खबर विनोद विजय रसाळ (34, ऱा कारवांचीवाडी, रत्नागिरी) यांनी शहर पोलिसांत दिल़ी या प्रकरणी पुढील तपास शहर पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस फौजदार पाटील करत आहेत़