प्रतिनिधी/गोडोली
शासनाने बांधकाम विभागाला कारवाई आदेश देऊन 2006 पासून ताब्यात न घेतलेल्या खोलीत न केल्याने आरटीओ कार्यालयाच्या परिसरात बेकायदेशिर हॉटेल व्यवसाय सुरु आहे.या जागेवर .बडया कुटूंबातील महिलेल्या नावावर असलेले या जागेची आजपर्यंत शासनास दमडी ही भाडेपोटी दिलेली नाही. माञ पोट भाडेकरु ठेवून प्रतीमहा हजारो रुपयांचे भाडे घेतले जाते. या हॉटेलवर कारवाई करण्यासाठी प्रशासनाकडून अद्याप काहीच हालचाल नाही. याबाबत माहिती घेतली असता महसूल,बांधकाम,आरटीओ कार्यालयापैकी कारवाईच्या जबाबदारी कोणाची या ञांगडयाचा घोळ समोर आला आहे.
साताऱयातील आरटीओ कार्यालयाच्या परिसरात 2000 च्या दरम्यान झुणका भाकर केंद्र योजना बंद पडली आणि त्या कारणासाठी येथे 200 चौ.मी.जागेवर एक खोली उभी झाली.त्या जागेत वाटीभर पिटले कधी शिजले नाही,साताऱयातील बडया कुटूंबातील ज्या महिलेच्या नावावर येथे व्यवसाय सुरु आहे,त्या एकदा ही काऊंटवर बसलेल्या कुणी पाहिलेले नाही,आत्तापर्यंत तब्बल 10 हून अधिक पोट भाडेकरु ठेवून महिन्याला हजारो भाडे घेतले जाते.या जागेचे एक दमडी ही भाडे शासनाच्या कोणत्याच विभागाकडे जमा झालेल्या माहिती प्राप्त नाही.
अनेक वेळा शासन,जिल्हाधिकारी,जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी ही जागा ताब्यात घेण्याबाबत आदेश दिले गेले आहेत. माञ कारवाई केली नसल्याने फुकटच्या जागेचे प्रतीमहा हजारो रुपयांचे घेण्याचा प्रकार अजून किती दिवस सुरु राहणार की आजपर्यंत च्या वसुलीसाठी संबंधितांना कायदयाच्या कचाटयात शासकिय यंञणा संबंधिताला अडकविणार,याची उत्सुकता लागली आहे.