प्रतिनिधी/सोलापूर
कोरोना डेल्टा प्लस व्हेरिएंटच्या पार्श्वभूमिवर महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार सोमवारपासून पुन्हा एकदा लॉकडाऊनला सुरुवात झाली आहे. सायंकाळी चारनंतर दुकाने बंद झाली. मात्र रस्त्यावर वर्दळ कायम होती.
सायंकाळी चारनंतर सर्व बाजारपेठा, दुकाने बंद ठेवण्याचे आदेश महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिले आहेत. सोमवारपासून लॉकडाऊनला सुरुवात झाली. सायंकाळनंतर दुकाने बंद होणार असल्याचे सकाळपासूनच नवी पेठ, अशोक चौक, कन्ना चौक, मधला मारुती येथील बाजारपेठेत गर्दी दिसून आली. सायंकाळी चारनंतर सर्वांनी कारवाईच्या भीतीने दुकाने बंद केली. सायंकाळी बाजारपेठेत शुकशुकाट होता.
एरवी खाद्यपदार्थांच्या हातगाडÎा दुपारनंतर उघडल्या जातात, आज मात्र सायंकाळी दुकाने बंद करायची असल्याने पार्क चौपाटी, गुरुनानक चौक, सात रस्ता येथील खाद्यपदार्थांच्या गाडÎा सकाळीच सुरु झाल्या होत्या. सायंकाळी चारनंतर दुकाने, बाजारपेठ बंद झाली. पण, रस्त्यावर गर्दी तशीच होती. महापालिकेच्या आदेशाचे पालन होताना दिसून आले नाही. सात रस्ता परिसरासह पोलीसांनी चौकाचौकात बंदोबस्त लावला होता. काही ठिकाणी कारवाईही करण्यात आली, पण कोरोनाची आणि कारवाईची भीती लोकांमध्ये जाणवली नाही. एकूणच काय तर सोलापूरकरांनी महापालिकेच्या आदेशाकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून आले.