सामंजस्य करारानुसार दिला राजिनामा. पंचायतीला नवीन सरपंचांचे वेध
प्रतिनिधी / डिचोली
मये मतदारसंघातील कारापूर सर्वच या पंचायतीचे सरपंच गोकुळदास सावंत यांनी सरपंचपदाचा राजिनामा पंचायज संचालनालयाकडे साझर केला आहे. गेल्या मार्च महिन्यात पंचसदस्य म्हणून निवडून आल्यानंतर या पंचायतीच्या रिक्त पदे असलेल्या सरपंचपदावर त्यांची थेट बिनविरोध निवड झाली होती. तर त्यावेळच्या सामंजस्य करारानुसार गोकुळदास सावंत यांनी आपला शब्द राखत सरपंचपदाचा राजिनामा दिला आहे.
सर्वण या प्रभागाचे माजी पंचसदस्य स्व. रमेश सावंत यांचे अकाली निधन झाल्यानंतर संपन्न झालेल्या पोटनिवडणुकीत गोकुळदास सावंत यांनी विजय मिळविला होता. या निकालानंतर लगेचच ता पंचायतीच्या रिक्त असलेल्या सरपंच पदासाठी निवडणूक प्रक्रिया होणार होती. या निवड प्रक्रियेत नव्यानेच पंचसदस्य बनलेल्या गोकुळदास सावंत यांना थेट सरपंचपदी विराजमान होण्याची संधी मिळाली. त्यांनी ती स्विकारत सरपंचही बनले.
आपल्या अवघ्याच सरपंचपदाच्या कार्यकाळात गोकुळदास सावंत यांनी अनेक कामे मार्गी लावली. तसेच प्रभागात उत्कृष्ट कामगिरी करून दाखवली आहे. अनेक वर्षांनंतर सर्वण गावात मोन्स?नपूर्व कामे साकारताना पाण्याचा निचरा योग्य प्रकारे व्हावा यासाठी काम केले. तसेच आवश्यक व शक्मय असलेल्या ठिकाणी जेसीबी यंत्राद्वारे रस्त्याच्या बाजूला असलेली माती व अडथळा ठरणारी झाडे हटवून रस्ता वाहतुकीसाठी सुरक्षित करून दिला. सर्वण मुख्य जंक्शनवर नामफलक आणि वाहतुकीला सोयीस्कर ठरावे यासाठी कनकेव ग्लास बसविले. त्याचबरोबर अनेक कामे त्यांनी आपल्या या अप्लशा कार्यकाळात केली आहेत.
आपल्या सरपंचपदाचा कार्यकाळ अलिखित करारानुसार संपताच गोकुळदास सावंत यांनी आपला शब्द राखत सरपंचपदाचा राजिनामा पंचायत संचालनालयाकडे सादर केला. त्यामुळे आता या पंचायतीला नवीन सरपंचाचे वेध लागले आहे. उपलब्ध माहितीनुसार उपसरपंच दामोदर गुरव हे आता सरपंचपदावर विराजमान होणार असल्याचे समजते. दामोदर गुरव यांनी हल्लीच भाजप पक्षातही प्रवेश केला आहे.