सावंतवाडी/ प्रतिनिधी-
सिंधुदुर्ग जिल्ह्यात वन्य प्राणी कडून शेती- बागायती उद्ध्वस्त केली जात असतानाच आता भात शेतीला निळे भूरे या किडीने ग्रासले आहे. सावंतवाडी तालुक्यातील सह्याद्री पट्ट्याच्या भागात कारिवडे, माजगाव, कलंबिस्त, सांगेली, ओटवणे, मळगाव या भागात शेतीत पूर्णपणे या निळे भूरे या किडीने पूर्णपणे कब्जा केला आहे. हजारो हेक्टर भागातील शेती पूर्णपणे सुकून गेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यावर नुकताच अतिवृष्टीमुळे आलेले संकटानंतर आता नव्याने हे किडीचे संकट उभे राहिले आहे. त्यामुळे शेती करायची तरी कशी असा प्रश्न आता शेतकऱ्यांवर उभा आहे.