प्रतिनिधी / रत्नागिरी
कारोना विषाणूच्या पार्श्वभूमिवर रत्नागिरीत मोठ्या उत्साहान साजऱया होणाऱया कार्तिकी एकादशीच्या उत्सावाला प्रशासनाकडून सशर्त प्ररवानगी देण्यात आली आह़े यावेळी फेरीवाल्यांवर प्रशासनाने बंदी घातली असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचा इशारा रत्नागिरी शहर पोलीस निरिक्षक अनिल लाड यांनी दिला आह़े.
रत्नागिरी शहरातील विठ्ठल मंदीर परिसरात दरवर्षी उत्साहाने कार्तिकी एकादशीचा उत्सव साजरा करण्यात येत़ा या दिवशी या परिसरातला जत्रेचे स्वरूप येत असत़े अनेक फेरीवाले रस्त्यावर दुकाने थाटून व्यवसाय करतात. मात्र सध्या कोरोना विषाणूचा पार्दुभाव लक्षात घेता हा उत्सव निर्बंधांसह साजरा करण्यास प्रशासनाकडून परवानगी देण्यात आली आह़े.
26 नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशी उत्सवादरम्यान दुकानदारांनी आपला माल दुचानाबाहेर मांडू नये, दुकानामध्ये येणाऱया ग्राहकांपासून सामाजिक अंतर राखणे, मास्क लावणे, आरोग्य सेतू ऍप, थर्मल स्किनिंग व सॅनिटायझरचा वापर आदी बंधनकारक करण्यात आले आह़े. या गोष्टींचे उल्लंघन करणाऱ्यांवर दखलपात्र गुन्हा दाखल करण्यात येईल असा इशारा पोलिसांकडून देण्यात आला आह़े.
उत्सव शांतपणे व संयमाने साजरा करावा
कारोनाचे संकट टळलेले नाह़ी त्यामुळे नागरिकांनी स्वतची व कुटुंबाची काळजी घेणे आवश्यकआह़े. जिह्यामध्ये कारोनाचे संकमण वाढू नये यासाठी कार्तिकी एकादशीचा उत्सव शांतपणे व संयमाने साजरा करावा असे आवाहन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले आह़े.