फेरीवाल्यांवर निर्बंध : नियंमाचे उल्लंघन झाल्यास दखलपात्र गुन्हा दाखल होणार
प्रतिनिधी / रत्नागिरी
कारोना विषाणूच्या पार्श्वभूमिवर रत्नागिरीत जिह्यात मोठय़ा उत्साहात साजऱया होणाऱया कार्तिकी एकादशीच्या उत्सावाला प्रशासनाकडून सशर्त परवानगी देण्यात आली आह़े यावेळी फेरीवाल्यांवर प्रशासनाने बंदी घातली आहे.
रत्नागिरी शहरातील विठ्ठल मंदीर परिसरात दरवर्षी उत्साहाने कार्तिकी एकादशीचा उत्सव साजरा करण्यात येत़ा या दिवशी या परिसरातला जत्रेचे स्वरूप येत असत़े अनेक फेरीवाले रस्त्यावर दुकाने थाटून व्यवसाय करतात. मात्र सध्या काराना विषाणूचा प्रार्दुभाव लक्षात घेता हा उत्सव निर्बंधांसह साजरा करण्यास प्रशासनाकडून परवानगी देण्यात आली आह़े नियमांचे उल्लंघन करणाऱयांवर गुन्हे दाखल करण्याचा इशारा रत्नागिरी शहर पोलीस निरिक्षक अनिल लाड यांनी दिला आह़े
26 नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशी उत्सवादरम्यान दुकानदारांनी आपला माल दुचानाबाहेर मांडू नये, दुकानामध्ये येणाऱया ग्राहकांपासून सामाजिक अंतर राखणे, मास्क लावणे, आरोग्य सेतू ऍप, थर्मल स्क्रिनिंग व सॅनिटायझरचा वापर आदी बंधनकारक करण्यात आले आह़े या गोष्टींचे उल्लंघन करणाऱयांवर दखलपात्र गुन्हा दाखल करण्यात येईल असा इशारा पोलिसांकडून देण्यात आला आह़े
उत्सव शांतपणे व संयमाने साजरा करावा
26 नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशी आहे. यादिवशी जिह्यातील अनेक मंदिरात पारंपारिक पद्धतीने जत्रा भरतात. नागरिकही येथे मोठय़ा प्रमाणात गर्दी करतात. परंतु यावर्षी कोरोनाचे सावट असल्याने प्रत्येकांने शांत व संयमाने उत्सव साजरे करावेत. शक्यतो गर्दी टाळावी. गर्दीमुळे देशातील अन्य राज्यांमध्ये लॉकडाऊन करण्याची वेळ आली आहे. ती वेळ आपल्यावर येवू नये यासाठी प्रत्येका काळजी घेण्याचे आवाहन नामदार सामंत यांनी केले आहे.