वारकरी पंढरपूरकडे रवाना : वारीतील आनंदासाठी उत्साह
प्रतिनिधी /बेळगाव
कार्तिक वारी अवघ्या पाच दिवसांवर येऊन ठेपल्याने वारकऱयांना विठुरायाच्या दर्शनाची ओढ लागली आहे. दरम्यान, गावागावांतून विठुरायाच्या दर्शनासाठी वारकरी पंढरपूरकडे रवाना होऊ लागले आहेत. मागील दोन वर्षात कोरोनामुळे वारी केवळ प्रतिकात्मक रुपात साजरी झाली होती. शिवाय काही मोजक्मया पालख्या आणि भक्तांनाच दर्शनास परवानगी होती. मात्र, यंदा कोरोनाचे संकट दूर झाल्यानंतर सर्वांना मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे. शुक्रवारी कार्तिक पौर्णिमा असल्यामुळे पंढरपुरात कार्तिक वारीसाठी लाखो वैष्णवांचा मेळा भरणार आहे.
आषाढी वारीनंतर कार्तिक वारीही मोठी समजली जाते. महाराष्ट्रासह देशभरातून लाखो भाविक या वारीसाठी एकवटतात. कोरोनामुळे आषाढी आणि कार्तिक वारीतही खंड पडला होता. मात्र, यंदा कार्तिक वारी सुरळीतपणे सुरू होणार आहे. त्यामुळे लाडक्मया विठुरायाच्या दर्शनासाठी भक्तांना आस लागली आहे. मागील दोन वर्षात वारी न झाल्याने वारकरी मंडळी निरुत्साही झाली होती. यंदा प्रत्यक्ष वारी होत असल्याने वारकऱयांमध्ये चैतन्य दिसून येत आहे. बेळगाव आणि परिसरातून कार्तिक वारीसाठी जाणाऱया वारकऱयांची संख्या अधिक आहे. वारीच्या पूर्वीच वारकरी पंढरपुरात दाखल होत असतात. यंदादेखील वारकरी पूर्ववतपणे पंढरपूरला रवाना होताना दिसत आहेत. विठ्ठल-रखुमाई मंदिर आणि चंद्रभागा खुली करण्यात आल्याने पंढरपूरला जाण्यासाठी भक्तांमध्ये उत्साह दिसून येत आहे.
तालुक्मयात सुगी हंगामाला प्रारंभ झाला आहे. बटाटा, रताळी, भुईमूग, सोयाबीन काढणीबरोबर भात कापणी सुरू झाली आहे. त्यामुळे बळीराजा सुगी हंगामात मग्न झाल्याचे दिसत आहे. दुसरीकडे कार्तिक वारी तोंडावर आल्याने वारकरी संप्रदायाला विठुरायाच्या दर्शनाची ओढ लागली आहे.
यंदा वारीत प्रत्यक्ष सहभाग
मागील दोन वर्षात भक्तांना विठुरायाचे दर्शन घेता आले नव्हते. मात्र, यंदा प्रत्यक्ष वारीत सहभागी होऊन दर्शन घेता येणार आहे. भगवंताचे नामचिंतन करून वारीत सहभागी होता येणार आहे. भगवंताच्या दर्शनाबरोबर चंद्रभागेत स्नान करण्याचे भाग्य लाभणार आहे.
– बळवंत हुंदरे, वारकरी