प्रतिनिधी / सरवडे
राधानगरी तालुक्यातील काळम्मावाडी धरण परिक्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने धरणात आज अखेर ९८.२०टक्के म्हणजेच २४.९३ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. आज धरणाच्या पाच वक्राकार दरवाजातून ३६०० कुसेक्स तर जल विद्युत केंद्रातून १००० कुसेक्स असा ४६०० क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग दूधगंगा नदी पात्रात सुरू आहे. पावसाचा जोर असाच राहिल्यास रात्री उशिरा विसर्ग वाढविण्यात येणार असल्याने सतर्कतेचा इशारा दूधगंगा नदीकाठच्या ग्रामस्थांना देण्यात आला आहे. पाण्याचा विसर्ग वाढवल्याने दूधगंगा नदी दुथडी भरून वाहत आहे.
काळम्मावाडी धरण परिक्षेत्रात आज दिवसभर १७ मि.मी पाऊस तर आज
अखेर २९२१मि. मि. इतका पाऊस झाला आहे. धरणाची पाणी साठा क्षमता २६ टि. एम.सी. इतकी असून आज अखेर पाणीसाठा २४.९३ टी.एम.सी. (९८.२० टक्के ) इतका झाला आहे. पावसाचे प्रमाण कमी असले तरी धरणात येणार्या पाण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे पाण्याचा विसर्ग वाढण्याची शक्यता आहे. नदीकाठच्या गावात दवंडी देण्यात आली आहे. अन्यथा आत्मदहन करू असा इशारा दिला असून नातेवायकांसह पन्नास ते साठ ग्रामस्थांच्या निवेदनावर सह्या आहेत.