सुधाकर काशीद / कोल्हापूर
स्वातंत्र्यापूर्वी कोल्हापुरात ब्रिटिशांचा मोठा साहेब (रेसिडेंट) एका बंगल्यात राहत होता. आता जेथे पोलीस मुख्यालय व पोलीस लाईन आहे त्याच्या तोंडाला त्याचा `रिट्रीट’ नावाचा बंगला होता. साहेबांचा बंगला म्हणजे त्याला 24 तास भरपूर व स्वच्छ पाणीपुरवठा पाहिजे. मग त्यासाठी एका विहिरीतून पाईपलाईन टाकून डिझेल पंपाने पाण्याचा उपसा करून साहेबांच्या बंगल्यापर्यंत पाणी पोहोचवले होते. ज्या विहिरीतून साहेबांच्या बंगल्यात पाणी आणले ती विहीर `कावळÎाच्या डोळÎाची विहीर’ म्हणून ओळखली जात होती. कावळÎाचा डोळा असे का म्हणायचे? तर, या विहिरीतील पाणी कावळÎाच्या डोळÎासारखे स्वच्छ, नितळ, पारदर्शी होते. केवळ साहेबांचा बंगला नव्हे तर त्यावेळच्या रिसाल्यातही (सैनिक तळ) याच विहिरीतून पाणी जात होते. आज साहेबांच्या बंगल्यात (डीआयजी निवासस्थान) व पोलिस वसाहतीत नळाचे पाणी आहे. एक काळ पाण्याचा एकमेव आधार असलेल्या कावळ्याच्या डोळ्याच्या विहिरीतील पाण्याचा पिण्यासाठी वापर थांबला आहे. पण आता ही विहीर शाहू कृषी तंत्र विद्यालयाच्या शेतीसाठी आपली सेवा देत आजही पाझरत आहे.
कोल्हापुरातली जलसाठे अजूनही किती समृद्ध आहेत याचे या विहिरी म्हणजे एक समृद्ध उदाहरण आहे. महासैनिक दरबार हॉलसमोर कृषी तंत्र विद्यालयाच्या आवारात या तीन भल्यामोठÎा दगडी विहिरी आहेत. 24 तास झुळुझुळु वाहणारे झरे या विहिरीच्या काठावर आहेत. चेहरा दिसावा असे आहे करावा अशी आहे. आज आपणच बुजवलेले मनकर्णिका कुंड कोटी, दोन कोटी रुपये खर्च करून पुन्हा खुले करत आहोत. पण आता आहेत ते जलसाठे जपले नाही तर भविष्यकाळात पाणी शोधायची वेळ आपल्यावर येणार आहे. त्यातील समृद्ध जलसाठा असलेल्या या कावळÎाच्या डोळÎाच्या विहिरींनी आपले वैशिष्टÎ या क्षणीही जपले आहे आणि इथून पुढे यावे याची जबाबदारी आपल्या कोल्हापूरकरांची आहे.
या तीन विहिरी म्हणजे विहिरीची बांधणी आणि जलसाठा एखाद्या अमूल्य संपत्ती सारखा कसा जपावा याचे धडे देणाऱया या विहिरी आहेत. यातील एक विहीर 70 ते 80 फूट खोल आहे. तळापर्यंत दगडी बांधकाम आहे. जेथे पाण्याचे झरे आहेत तेवढी जागा मोकळी सोडली आहे. त्यामुळे 24 तास या झऱयातून या विहिरीत पाणी पडत असते. आणि पाण्याची पातळी कायम ठेवत असते.
या विहिरींनी ब्रिटिश अधिकाऱयांच्या निवासस्थानांना, पोलिस वसाहतीला पाणीपुरवठा केला. 1929 साली शाहू कृषी तंत्र विद्यालय म्हणजे त्या वेळचे एग्रीकल्चर म्युझियम झाले. त्यासाठी 14-15 एकर शेती करण्यात आली असून या शेतीला या विहिरीतून पाणीपुरवठा केला जातो. कृषी तंत्र विद्यालयाचे प्राचार्य किरण गुरव त्याची देखभाल करतात. विहिरी कायम स्वच्छ राहाव्यात यासाठी प्रयत्न करतात. अर्थात या विहिरी त्यांच्या संस्थेच्या आवारात म्हणून त्यांच्या आहेत. पण तो आपल्या कोल्हापूरचा समृद्ध जलसाठा आहे. आणि तो जपणे हाच आपला खरा जल वारसा आहे.