नागठाणे : शिवराजनगर (काशीळ) ता.सातारा येथे एकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी रात्री उशिरा उघडकीस आली. निवास सखाराम जगताप (वय.40, रा.वडीरायबाग, ता.कडेगाव, जि.सांगली) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
शुक्रवारी रात्री उशिरा अतुल तानाजी जाधव (रा.उंब्रज,ता.कराड) हे शिवराजनगर (काशीळ) गावच्या हद्दीत महामार्गालगत असलेल्या शिवारातील सोयाबीनला पाणी देण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांना जंगली झाडास गळफास घेऊन एकाने आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. याची माहिती त्यांनी बोरगाव पोलिसांना दिली. पोलिसांनी मृताजवळ सापडलेल्या मोबाईलवरून अधिक चौकशी केली असता मृताचे नाव निवास जगताप असल्याचे निष्पन्न झाले. याची फिर्याद अतुल जाधव यांनी दिली असून, पुढील तपास हवालदार बाबा महाडिक करत आहेत.