गावात विवाहात हुंडा-वायफळ खर्चाला मनाई
दोन्ही कुटुंबे उचलतात घर्च
30 वर्षांपासून घरगुती हिंसाचाराची एकही घटना नाही
श्ा़खाrनगरच्या गांदरबल जिल्हय़ातील सुंदर दऱयाखेऱयांदरम्यान बाबा वायिल गाव वसलेले आहे. येथील लोकांच्या उत्तम वर्तनामुळे या गावाला लोक ‘बडा घर’ म्हणतात. या गावात विवाहात दागिने आणि हुंडय़ावर पूर्णपणे बंदी आहे. या गावातील लोक तीन दशकांपासून याचे पालन करत आले आहेत. या गावात वधू किंवा वराला भेटवस्तूदाखल सोन्याचा दागिना देण्याची प्रथा नाही. गावातील श्रीमंत आणि गरीब या नियमाचे कसोशीने पालन करतात. तीन दशकांपूर्वी लेखी दस्तऐवजावर स्वाक्षरी करत गावातील लोकांनी यासंबंधीच्या नियमांचा होकार दर्शविला होता. या दस्तऐवजानुसार विवाहसोहळय़ात वायफळ खर्चावरही पूर्णपणे बंदी आहे.
गावात सर्व कार्यक्रम साधेपणाने होतात. वधू आणि वर या दोन्ही बाजूंकडून मिळून खर्च केला जातो. हुंडा घेतल्याचे कुणी आढळल्यास संबंधितावर सामाजिक बहिष्कार टाकला जातो. एवढेच नाही तर संबंधित कुटुंबात कुणाचे निधन झाल्यास गावातील कुठलाच व्यक्ती जात नाही. या सर्व नियमांमुळे लोकांच्या जीवनावर मोठा प्रभाव पडला आहे. 30 वर्षांमध्ये गावात घरगुती हिंसाचार आणि हुंडय़ाचे एकही प्रकरण समोर आलेले नाही. इतकेच नव्हे तर हुंडा आणि विवाहातील खर्चाचा दबाव नसल्याने गावातील लोक मुलींचा विवाह योग्य वयात करू शकत आहेत. तर काश्मीरच्या अन्य काही भागांमध्ये मुलींचा वयाच्या 35 वर्षांपर्यंत विवाह होऊ शकत नसल्याची स्थिती आहे, कारण त्यांचे कुटुंब हुंडा आणि विवाहाचा खर्च उचलण्यास असमर्थ आहे.