वृत्तसंस्था/ श्रीनगर
जम्मू काश्मीरमध्ये सीमारेषेजवळ पाकिस्तानने केलेल्या गोळीबाराला पॅरा कमांडोंसह सेनादलाच्या जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले. या कारवाईमध्ये घुसखोरी करणाऱया पाच दशहशतवाद्यांना ठार मारण्यात आले असून शनिवारी दुपारच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. सेनादलाने बोफोर्स तोफांच्या मदतीने एलओसीनजिक असणारे दहशतवाद्यांने अनेक लाँचपॅडही उदध्वस्त केले आहेत.
संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते कर्नल देवेंद्र आनंद यांनी ही माहिती दिली. पाकिस्तानने सकाळी दहाच्या सुमारास किरनी सेक्टरमध्ये मॉर्टरगनच्या मदतीने तोफगोळे डागले. तर मेंढर सेक्टरमध्येही साडेदहाच्या सुमारास हाच प्रकार झाला. नागरी वस्त्यांना लक्ष्य केल्याने एका घराचे पूर्ण नुकसान झाले. तर अन्य घरेही पडली आहेत, असे त्यांनी सांगितले.
त्याला प्रत्युत्तर देताना भारतीय सेनेने एलओसीनजिक असणाऱया लाँचपॅडला लक्ष्य केले. कुपवाडा सेक्टरमध्ये ही कारवाई करण्यात आल्याचे कर्नल आनंद यांनी सांगितले. तर शुक्रवारी पहाटेच्या सुमारास पॅरा कमांडो आणि घुसखोरांमध्ये झालेल्या कारवाईत पाच दहशतवादी मारले गेले. त्याचबरोबर 5 कमांडो हुतात्मा झाले, असे कर्नल देवेंद्र आनंद यांनी सांगितले.