प्रतिनिधी/ सातारा
सध्या कोरोनामुळे अनेकांचे जगणे मुश्कील झाले आहे.हाताला काम नसल्याने काही परप्रांतीय आपल्या गावी गेले आहेत.तर काहींना अजून ही आशा आहे.त्यातच सातारा शहरात कासट मार्केट मध्ये अतिक्रमण केलेल्या टप्रयामध्ये परप्रांतीय भाडय़ाने व्यवसाय करतात.त्यांना आता चोरटय़ाचे ग्रहण लागले आहे.चोरटय़ाच्याकडून या टप्रया उचकटून चोया होत आहेत.त्यामुळे परप्रांतीय व्यावसायिक पुरते हतबल झाले असून एक तक्रार सातारा शहर पोलिसात दाखल झाली आहे.मात्र, लॉक डाऊनच्या काळात शहरात चोरीच्या घटना 99 टक्के कमी झाल्याचे दिसत होते.या परिसरात आठवडाभरात तीन टप्रया फोडल्याने उलटसुलट चर्चा सुरू आहे.
तहसीलदार कार्यलय ते कासट मार्केट या दरम्यान अवैध व्यवसाय चालतात हे पोलिसांना ही माहिती आहे.याच रस्त्यावर काही परप्रांतीय नागरिकांना टप्रया चालवण्यासाठी काही दादा मंडळींनी दिल्या आहेत.लॉक डाऊनमध्ये त्या टप्रयात साहित्य तसेच होते.लॉक डाऊन शिथिल झाल्यानंतर त्या परप्रांतीय व्यावसायिकांनी आपला सातारा बरा म्हणत पुन्हा आपली दुकाने उघडली.परंतु दुकाने उघडण्यास सुरुवात करताच गेल्या आठवडय़ापासून एक दिवसाआड कोणाची ना कोणाची टपरीचे दार सकाळी उचकटलेले दिसते अन आतील साहित्य चोरीला जाते.चप्पल, कापड विक्री करणायाच्या टप्रयामध्ये चोरी झाली पण तक्रार दाखल झाली नाही.तर मोबाईल विक्री करणाया परप्रांतीय व्यावसायिकाने तक्रार दाखल केली आहे. रवींद्र गोरख प्रसाद (सध्या रा.कामठी पुरा मूळ रा.बिहार)याने दाखल केलेल्या फिर्यादीनुसार गेल्या तीन वर्षांपासून कासट मार्केट मध्ये प्रसाद यांची मोबाईलची शॉपी आहे.टपरीवजा दुकान चालवतात.नवीन मोबाईल, मनगटी घडयाळ, असे साहित्य विकतो.दि.29 मे रोजी सकाळी 9 वाजता शॉपी उघडली आणि दिवसभर विक्री करून पुन्हा बंद केली.दुस्रया दिवशी दि.30रोजी सकाळी 9 वाजता मोबाईल शॉपी उघडण्यासाठी आला असता पत्रा उचकटेला होता.साहित्य विस्कळीत पडले होते.अज्ञात चोरटय़ाने वेगवेगळ्या कंपनीचे 12 मोबाईल फोन, 30 घडय़ाळे, 50 हेडफोन, असे 35 हजार रुपयांचे साहित्य चोरीला गेले.शहर पोलिसात फिर्याद दाखल करण्यात आली असून हवालदार पाटील तपास करत आहेत.