टोप / वार्ताहर
कासारवाडी पिण्याच्या पाण्याच्या पाईपखुदाईस वन विभागाचा अडथळा होता तो प्रश्न खा. धैर्यशिल माने यांच्या प्रयत्नातुन विजयसिंह माने यांच्या पुढाकाराने वनउपसंरक्षक आर.आर.काळे कासारवाडी ग्रामस्थ याच्या समवेत झालेल्या बैठकीत प्रस्ताव दाखल करुन पाईपलाईन करण्यास सहमती दिल्याचे बैठकित ठरले. ही बैठक खा.धैर्यशिल माने यांच्या दालनात झाली.
कासारवाडी गावाला पाणी टंचाई नेहमी भेडसावत होती.या वर उपाय योजना म्हणुन युवा नेते विजयसिंह माने व भादोले जिल्हा परीषदेच्या जि.प सदस्या मनिषा माने यांच्या प्रयत्नातुन कासारवाडी गावासाठी पंचगंगा नदीवरुन राष्ट्रीय ग्रामीण पेयजल य़ोजना राबविण्यासाठी नदीलगत ४ गुंठे क्षेत्र घेवुन विहिर काढण्यात आली आहे. त्या विहिरीस मुबलक प्रमाणत पाणी आहे याचे ७० टक्के काम पूर्ण झाले आहे. विहिरीवरुन पाणी पाईप लाईनद्वारे शिये डोंगरातून कासारवाडी गावाला नेण्यात येणार आहे.
ही पाईप लाईन वनविभागाच्या हद्दीतुन जात असल्याने त्या पाईप लाईन कामास वनविभागाने मनाई केली असता युवा नेते विजयसिंह माने व जि.प.सदस्या मनिषा माने यांच्या नेतृत्त्वाखाली खा.धैर्यशिल माने यांच्या समवेत वनअधिकारी व उप वनसरक्षक आर.आर .काळे यांच्याशी चर्चा करून पाईपलाईन संदर्भात मार्ग काढण्यात आला .यामुळे कासारवाडी गावची राष्ट्रीय पेयजल योजना पूर्णत्वाकडे जाणार आहे. या शिष्टमंडळात कासारवाडी मा.सरपंच मारुती खोत, विलास खोत, ग्रामपंचायत सदस्य नेताजी चेचरे, कृष्णात वागवे, सहदेव वरुटे,जयसिंग यादव सतिश मोरे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.