धरणावर बेमुदत अंदोलन सुरु
वार्ताहर / कास
सातारा शहराला पाणीपुरवठा करणाऱया कास धरणाच्या भिंतीची उंची वाढविण्याचे काम जोमात सुरु आहे. मात्र धरणक्षेत्रासाठी जमीन संपादित झालेल्या कास ग्रामस्थांच्या मागण्याकडे वारंवार निवेदने देऊन बैठका घेऊनही प्रशासनाने जाणीवपुर्वक दुर्लक्ष केल्याने कास धरण कृती समितीने शुक्रवारी धरणाचे काम बंद पाडुन धरणाच्या भिंतीवर बेमुदत ठिय्या अंदोलन सुरु केले आहे.
कास धरणांसाठी आत्तापर्यंत तिनवेळा 115 हेक्टरहुन अधिक जमीन संपादित करण्यात आली असुन टप्याटप्याने जमीन संपादित केल्याने त्यांना पुर्नवसन कायदा लागु केला नाही. तिसऱया टप्यात जमीन संपादन होताना अनेक खातेदार भुमिहीन होणार असल्याने सर्वांना पुर्नवसन कायदा लागु करा, कुटुंबातील एकाला नगरपालिकेत सरकारी नोकरी द्या, धरणाच्या बाजुने रिंगरोड करा, जुने मंदीर पाण्यात गेल्याने नवीन मंदिर बांधुन द्या, मुलकी पड गंट नं 70 मध्ये गावठाणासाठी जागा उपलब्ध करून परवानगी द्या, सातारा- कास- बामणोली प्रा जि मार्ग 26 जुन्या सर्वेनुसारच त्वरित करा व तो प्रमुख रस्ता कॅनॉलच्या बाहेरुन गावच्या बाजुनेच करावा. स्मशानभुमीसाठी जागा उपलब्ध करून बांधुन द्या, पुर्नवसन दाखले द्या आदी विविध मागण्या घेऊन कास ग्रामस्थांनी धरणाचे काम बंद पाडुन धरणाच्या भिंतीवर बेमुदत ठिय्या अंदोलन सुरु केले आहे.
धरणाचे काम बंद पाडुन ग्रामस्थांनी धरणावर बेमुदत अंदोलन सुरु करताच जलसंपदाविभागाचे आधिकारी नगरपालिकेचे अधिकारी, संबधित कॉन्ट्रक्टर यांनी धरणाकडे धाव घेऊन ग्रामस्थांना मागण्या मान्य होतील, अंादोलन मागे घ्या, असे तोंडी आश्वासन देवुन विंनती केली. मात्र ग्रामस्थांनी सपुर्ण मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत धरणाचे काम चालु देणार नाही व आंदोलनही मागे घेणार नसल्याचे सांगितले.