आ. शिवेंद्रसिंहराजेंनी मानले ना. अजित पवारांचे आभार; वाढीव 57.91 कोटी मंजूर
प्रतिनिधी / सातारा
वाढीव निधी मिळत नसल्याने सातारकरांचा जीवनदाता असलेल्या कास धरणाच्या उंची वाढवण्याच्या कामाला ब‘sक लागला होता. ज्या ना. अजित पवारांनी आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मागणीवरुन या प्रकल्पाला मंजूरी दिली होती त्याच ना. पवारांनी काही दिवसांपुर्वी आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्याच मागणीवरुन कास धरण प्रकल्पासाठी वाढीव निधी देण्याचे जाहिर केले होते. आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या सातत्यपुर्ण पाठपुराव्यामुळे ना. अजित पवार यांनी नुकत्याच झालेल्या अधिवेशनात कास धरण प्रकल्पाच्या कामासाठी वाढीव 57.91 कोटी निधीची तरतूद केली आहे. यामुळे बहुचर्चीत आणि महत्वकांक्षी कास धरणाची उंची वाढवण्याचे निधी अभावी थांबलेले काम आता लवकरच मार्गी लागणार असून हा प्रकल्प पूर्ण होण्यातील सर्वच अडचणी दूर झाल्या आहेत. सातारकरांचा जिव्हाळ्याचा प्रश्न सोडवल्याबद्दल आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी ना. पवार यांचे सातारकरांच्यावतीने आभार मानले आहेत.
दरम्यान, सातारा नगर पालिकेत सत्ता नसतानाही सातारकरांचा आणि सातारा शहराचा पाणीप्रश्न कायमस्वरुपी सुटावा यासाठी कायम झटणार्या आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी कास धरण प्रकल्पासाठी आवश्यक असणारा निधी मिळवलाच आणि हा प्रश्न कायमचा मार्गी लावला. याबद्दल सातारकरांमधून समाधान व्यक्त होत आहे.
सातारा शहरासह आसपासच्या 15 गावांचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी मिटण्यासाठी कास धरणाची उंची वाढवणे आवश्यक होते. त्यासाठी आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी कॉंग‘sस- राष्ट्रवादी आघाडीचे सरकार असताना तत्कालीन उपमु‘यमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा करुन कास धरणाची उंची वाढवण्याचे काम मंजूर करुन घेतले होते. त्याचवेळी राज्याच्या पाणीपुरवठा विभागाकडून निधीही उपलब्ध करुन घेण्यात आला होता. तसेच वन विभाग, हरित लवाद यासह अनेक विभागाच्या परवानग्याही आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या अथक पाठपुराव्यातून मिळवण्यात आल्या होत्या आणि त्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली होती. सद्य परिस्थितीत कास धरण प्रकल्पाचे काम 75 ते 80 टक्के पुर्ण झाले आहे. मात्र वाढीव निधीची तरतूद न झाल्याने गेल्या अनेक महिन्यांपासून पुढील काम रखडले आणि कास धरण प्रकल्प पुर्णत्वास जाणार का? सातारकरांचा पाणीप्रश्न सुटणार का, असे प्रश्न निर्माण झाले होते. मात्र पुन्हा एकदा आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या मागणीनुसार ना. अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या प्रकल्पासाठी वाढीव 57.91 कोटी रुपये निधीला मान्यता देण्यात आली होती परंतु या निधीला राज्याच्या वित्त विभागाकडून प्रशासकीय मान्यता मिळणे आवश्यक होते. त्यासाठी आ. शिवेंद्रसिंहराजे यांचा पाठपुरावा सुरु होता.
काही दिवसांपुर्वी ना. अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या व्यय अग‘क‘म समितीच्या बैठकीत आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी कास धरण प्रकल्पाच्या सुधारीत प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता मिळून निधी मंजूर करण्याची मागणी केली. तसेच प्रकल्पामुळे सातारा, कास ते बामणोली हा रस्ता बाधीत झाला असून या रस्त्यावरील नवीन पुलालाही निधी उपलब्ध करुन द्यावा, अशी आग‘ही मागणी आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी केली होती. ना. अजित पवार यांनी तत्काळ वित्त विभागाच्या अधिकार्यांना सुचना देवून नवीन पुलासह कास धरण प्रकल्पासाठी वाढीव निधीस मान्यता देण्याच्या सुचना अधिकार्यांना केल्या होत्या. ना. पवार यांच्या सुचनेनुसार वित्त विभागाने तत्काळ 57.91 कोटी रुपये निधीला प्रशासकीय मान्यता दिली होती. दरम्यान, या निधीची तरतूद होणे आवश्यक होते. नुकत्याच झालेल्या दोन दिवसीय अधिवेशनात आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी ना. पवार यांची भेट घेवून कास धरण प्रकल्पाच्या वाढीव निधीच्या प्रस्तावाला मान्यता देवून निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी केली. तशा आशयाचे पत्रही आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी ना. पवार यांना दिले.
आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या मागणीनुसार ना. पवार यांनी कास धरण प्रकल्पासाठीच्या वाढीव 57.91 कोटी निधीची तरतूद पाणीपुरवठा विभागातून केली आहे. यामुळे कास धरण प्रकल्पाचे रखडलेले काम लवकर सुरु होवून पुर्णत्वास जाण्याचा मार्ग मोकळा झाला असून आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या पाठपुराव्यामुळे या प्रकल्पासाठीच्या सर्वच अडचणी आता दूर झाल्या आहेत. त्यामुळे आता कास धरणाच्या उंची वाढवण्याचे काम येत्या काही महिन्यात पुर्ण होईल हे निश्चित.
नवीन पुलासाठी 3.5 कोटीची तरतूद
कास धरण उंची वाढवण्याच्या प्रकल्पामुळे सातारा, कास ते बामणोली हा रस्ता बाधीत होत आहे. त्यामुळे या रस्त्यावर नवीन पूल बांधणे आवश्यक असून त्यासाठीही निधी मंजूर करावा अशी मागणी आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी ना. पवार यांच्याकडे केली होती. या पुलाच्या निधीलाही ना. पवार यांनी मंजूरी दिली असून सातारा, कास- बामणोली या रस्त्यावरील नवीन पूलासाठी 3.5 कोटी रुपये निधीची तरतूद ना. पवार यांच्या सुचनेनुसार सार्वजनिक बांधकाम विभागाकडे करण्यात आली आहे. त्यामुळे या रस्त्याच्या कामालाही आता गती मिळणार असून लवकरच भव्य आणि दर्जेदार रस्ता दळणवळणासाठी उपलब्ध होणार आहे.