प्रतिनिधी/ सातारा
कोरोना हा संसर्ग मोठा असला तरी त्यावर मात करणे शक्य आहे. योग्य उपचार आणि सकारात्मक विचार हा एकच पर्याय आहे. यासाठी नातेवाईकांनी आणि पेंशटनी सकारात्मक राहणे गरजेचे आहे. तरच कोरोनाशी यशस्वी लढा देवू शकता हेच आवाहन सातारचे गुलाबराव मारूती देशमुख यांनी कोरोना बाधितांना त्यांच्या शब्दातून केले आहे.
कोरोनाचा संसर्ग वाढत असताना मला कोरोना होईल. यांचा क्षणभर विचारही मनात आला नव्हता. फक्त बातम्या, आजुबाजुच्या परिसरातील बाधित आढल्यास समोर निर्माण होणारी परिस्थिती पाहून काळजी घेणे गरजेचे असल्याचे वाटत होते. त्यानुसार काळजीही घेत होते. मात्र सुरूवातील ताप आला, उलटय़ा सूरू झाल्या. यामुळे टेस्ट केली. त्यामध्ये कोरोना रिपोर्ट पॅझिटिव्ह आले. हा एक धक्काच बसला होता. माझ्यामुळे घरातील सर्वच सदस्य बाधित झाले काय ? या एका विचाराने मी घाबरलो होते. आणि पत्नी, भाचा पॅझिटिव्ह आले. त्यांना सौम्य लक्षणे होती. यामुळे होम आयसोलेट ठेवले. मी मात्र यशवंत हॉस्पिटल मध्ये दाखल झालो. दाखल झाल्यानंतर लगेच उपचार सूरू झाले. यावेळी कुटुंबातील सर्वच सदस्य टेंशन मध्ये होते. माझे वय 71 असून मला उच्च रक्तदाबाचा त्रास आहे. तरीही मी कोरोनाशी लढा यशस्वी करून घरी परत येण्याचा निश्चय केलाच होता.
यामुळे सकारात्मक विचार करायला सुरूवात केली. कारण कोरोना संसर्ग मोठा नाही. त्याला हरवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करणे गरजेचे आहे. आणि मी तेच केले. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार दररोज औषधे घेत होतो. दवाखान्यात असूनही जास्त ताण घेत नव्हतो. दवाखान्यात सर्वच रूग्णांना समुपदेशन करण्यात येत होते. तसेच डॉक्टरही रूग्णांच्या प्रकृतीची काळजी घेत होते. आज सर्वत्र डॉक्टरांच्या हलगर्जीपणा मुळे कोरोना बाधित रूग्ण दगावल्याचे पहायला मिळत आहे. मात्र यशवंत हॉस्पिटलमध्ये डॉक्टर काळजी घेत आहेत. ही मी सगळयात जवळून अनुभवलेली बाब आहे.
यामुळे मी सर्वांना विनंती करतो की, तुमचे वय कमी आहे की जास्त यांचा विचार करू नका, स्वतः वर आणि डॉक्टरांवर विश्वास ठेवा. तुम्ही नक्की कोरोनावर मात करू शकता. आज मी कोरोनावर मात केली आहे.