बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटक किनारपट्टी, दक्षिणेकडील आणि दक्षिण अंतर्गत कर्नाटकातील काही भागात सलग तिसर्या दिवशी मुसळधार पाऊस सुरूच आहे. पावसामुळे काही भागात पूर येण्याची शक्यता आहे. कोडगू जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून जोरदार वार्यासह, मुसळधार पाऊस पाडत आहे.
जिल्ह्यातील काही भागात सोमवारी रात्री मुसळधार पाऊस झाला. काही ठिकाणी पेरणी व पुनर्लावणी संपवलेले शेतकरी पीक पाण्याखाली गेल्यानंतर चिंतेत पडले आहेत. पाऊस आणि हलक्या वार्यामुळे कॉफी बेरी जिल्ह्यातल्या कॉफीच्या बागांमध्ये मरत आहेत.
कोडगू आणि मालनाड जिल्ह्यात जोरदार पावसाने हजेरी लावली असून, रविवारपासून मंड्या जिल्ह्यातील कावेरी नदी ओसंडून वाहत असून कृष्ण राज सागर (केआरएस) धरणात पाण्याची आवक वाढली आहे. धरणातील पाण्याची पातळी कमाल पातळीवर पोहोचली (१२४ फूट) आहे आणि कावेरी नीरवारी निगम लिमिटेडने धरणातून ३७ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु असल्याचे म्हंटले आहे. १४ ते २० सप्टेंबर दरम्यान कोडगू, शिवमोगा, हसन आणि चिक्कमंगळूर येथे ७४ मिमी पाऊस पडला आहे.
उडुपी जिल्ह्यात पूरस्थिती शांत झाली, परंतु कृष्णा मठ आणि आसपासच्या भागातील पाण्याची पातळी खाली कमी झाली होती. जिल्ह्यातील विविध गावात अनेक घरे अर्धवट पडून नुकसान झाले आहे. उत्तर कर्नाटकात विजयनगर, रायचूर, गुलबर्गा, बिदर जिल्ह्यात मुसळधार पावसानं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. तर, बेंगळूर, म्हैसूर आणि तुमकूर जिल्ह्यातही गेल्या काही दिवसांत मुसळधार पाऊस पडत आहे.