प्रतिनिधी
राज्य सरकारने जारी केलेल्या विकेंड कर्फ्यूदिवशी सकाळच्या सत्रात शनिवारी बाजार भरला. यावेळी गेल्या आठवडय़ाच्या तुलनेत काही भाजीपाल्यांचे दर कमी झाल्याचे पाहायला मिळाले. शनिवारी एपीएमसी भाजी मार्केटमध्ये भाज्यांची आवक वाढली असल्याने किरकोळ बाजारातील भाजीपाल्यांचे दर कमी झाले होते. या आठवडय़ात शिमला मिर्ची (ढबु), वांगी, बिनीस, दोडकी, भेंडी, बटाटा या भाज्यांच्या दरात गेल्या आठवडय़ाच्या तुलनेत घसरण झाली. विकेंड कर्फ्यूमुळे देखील दुपारपर्यंतच बाजार भरल्याने शनिवारच्या बाजारपेठेवर परिणाम झाल्याचे दिसून आले.
शनिवारी किरकोळ बाजारात लालभाजी 15 रूपयाला 2 जुडय़ा, पालक 20 रू.चार, मेथी 15 रू.पेंडी, कडीपत्ता 10 रू पेंडी, कांदापात 20रू.पाच, दुधीभोपळा 20 ते 30रू, टोमॅटो 20 रूपये किलो, फ्लॉवर 20 रूपयाला एक, ढबु 20 रू किलो, वांगी 15 रू किलो, कोबी 10 रूपयाला एक, दोडकी 50 रूपये किलो, बटाटा 15 ते 20 रू किलो, बिनीस 50 रू किलो, भेंडी 50 रू किलो, मिर्ची 30 रू किलो, गाजर 20 रू किलो दराने विक्री करण्यात आले.
मागील पंधरा दिवसाच्या तुलनेत भाजीपाल्यांची आवक वाढली आहे. विविध जातीच्या भाज्या बाजारात दिसून येत आहेत. तसेच काही भाज्यांच्या दरातही घसरण झाली आहे. मात्र काही भाजीपाल्यांचा दर स्थिर आहे. सध्या पावसाचा जोर बऱयाच प्रमाणात कमी झाला आहे. त्यामुळे एपीएमसी मार्केट भाजीपाल्यांची आवक होत आहे. विकेंड कर्फ्यू असल्याने नागरिकांना दुपारी 2 पर्यंत भाजीपाला खरेदी करण्याची मुभा होती. तसेच उद्यापासून श्रावण महिन्याला सुरुवात होत असून फळांच्या मागणीतही वाढ झालेली दिसून आली. मात्र यावेळी विकेंड कर्फ्यूमुळे फळ विपेत्यांना दुपारपर्यंतच फळांची विक्री करता आली. त्यामुळे सकाळच्या सत्रातच नागरीकांची गर्दी दिसून आली. त्यानंतर दुपारी बाजारपेठेत शुकशुकाट पसरला.
खाद्यतेलाच्या दरात आणखी वाढ
गेल्या आठवडय़ात खाद्यतेलाच्या दरात काही प्रमाणात वाढ झाली होती. मात्र हे दर स्थिर राहण्याऐवजी पुन्हा 10 रूपयांनी वाढले. तसेच सुर्यफुल तेलाच्या किमतीत 5 रूपयांनी वाढ झाली असून सध्याचे दर सुर्यफुल 130 रू किलो, पामतेल 155 रू किलो, सोयाबीन 160 रू किलो असा आहे.