दर आवाक्मयाबाहेर, सर्वसामान्यांना चटका,
प्रतिनिधी/ बेळगाव
मागील महिन्याभरापासून भाज्यांची आवक कमी झाल्याने दरात भरमसाठ वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. वाढत्या महागाईबरोबर भाजीपाल्यांच्या वाढत्या दराचे चटके सहन करावे लागत आहेत. किरकोळ बाजारात दोडकी, गवार, ढबू, बिन्स, वांगी, टोमॅटो, कारली, आदी भाज्यांचे दर आवाक्मयाबाहेर गेले आहेत.
शनिवारच्या किरकोळ भाजीपाला बाजारात दोडकी 60 रु. किलो, गवार 60 रु. किलो, ढबू 60 रु. किलो, बिन्स 60 रु. किलो, वांगी 40 रु. किलो, टोमॅटो 60 रु. किलो, कारली 60 रु. किलो, काकडी 50 रु. किलो, फ्लावर 30 रुपयाला एक, मेथी 10 रुपयाला एक पेंडी, शेपू 10 रुपयाला एक, लाल भाजी 10 रुपयाला दोन पेंडय़ा, पालक 10 रुपयाला दोन पेंडय़ा, गाजर 30 रुपये किलो, दुधीभोपळा 15 रुपयाला एक, बटाटा 25 ते 30 रुपये किलो, आलं-लसूण 100 रुपये प्रति किलो तर लिंबू 10 रुपयाला 8 नग, याप्रमाणे विक्री सुरु होती. मागील महिन्याभरात भाजीपाल्याच्या दरात भरमसाठ वाढ झाल्याने सर्वसामान्यांना भाजीपाला खरेदी करणे कठीण झाले आहे.
मागील काही दिवसांपासून कारली, वांगी, दोडकी, गवार, मेथी, टोमॅटो आदींच्या दरात मोठी वाढ झाल्याने नागरिक कडधान्य खरेदीलादेखील पसंती देत आहेत. त्याबरोबर भाजीपाल्यांचे दर प्रतिकिलो 60 रुपयांहून पुढे गेल्याने नागरिक अंडी, मासे, चिकन, खरेदी करताना दिसत आहेत.
लिंबू आवक वाढली
शनिवारच्या आठवडी बाजारात लिंबू आवक मोठय़ा प्रमाणात वाढली होती. त्यामुळे दरातदेखील घट झाली आहे. 10 रुपयाला आठ लिंबू विक्री केली जात होती. आठवडय़ापूर्वी तीन रुपयांप्रमाणे विक्री होणारा लिंबू आता एक रुपयाला एक झाला आहे.
अवकाळी पावसाचा फटका
मागील काही दिवसांपासून अवकाळी पावसाने धुमाकूळ घातल्याने भाजीपाला बाजारावरदेखील परिणाम झाला आहे. शिवारात पाणी आणि चिखल असल्याने भाजीपाला काढणी थांबली आहे. त्यामुळे भाजीपाल्यांची आवक कमी झाल्याने दरातदेखील वाढ झाली आहे. एपीएमसी मार्केटमध्ये भाजीपाल्यांची आवक कमी होती. त्यामुळे किरकोळ बाजारातदेखील आवक कमी असल्याचे दिसून आले.