आश्वासक कारवाईची जनतेकडून अपेक्षा, सोने विक्रीनंतर पैसे कोणाच्या खिशात?
प्रतिनिधी / बेळगाव
बहुचर्चित सोने चोरी प्रकरणाला दिवसेंदिवस वेगवेगळी कलाटणी मिळत चालली आहे. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर गृहखात्याने चार अधिकाऱयांच्या तडकाफडकी बदल्या केल्या आहेत. या प्रकरणात हुबळी येथील किरण वीरनगौडर या दलालाने मध्यवर्ती भूमिका बजावली आहे. बेळगाव उत्तर विभागाचे पोलीस महानिरीक्षक राघवेंद्र सुहास यांच्यासोबत त्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
एखाद्या उत्कंठावर्धक वेबसिरीजप्रमाणेच या चोरी प्रकरणाचे कथानक बाहेर पडत आहे. या संपूर्ण प्रकरणाचा सूत्रधार हुबळीचा किरण वीरनगौडर हा दलाल असून वरिष्ट पोलीस अधिकाऱयांशी घनिष्ट संबंध ठेवत या महाभागाने अनेक प्रकरणे केल्याचे उघडकीस येत आहे. पोलीस अधिकाऱयांच्या बदल्या करण्यापासून त्यांना वेगवेगळय़ा गुन्हेगारी प्रकरणांची माहिती पुरवून मांडवली करण्यात तो नेहमी आघाडीवर असतो. सध्या हा दलाल सीआयडीच्या रडारवर आला आहे.
9 जानेवारी 2021 पासून हे प्रकरण सुरू होते. थेट बेळगाव उत्तर विभागाचे पोलीस महानिरीक्षक (बदली झालेले) राघवेंद्र सुहास यांना सोने तस्करी संबंधी माहिती मिळते. पोलीस अधिकाऱयांना ही माहिती देऊन मंगळूरहून कोल्हापूरकडे जाणारी अर्टिगा कार हत्तरगी टोलनाक्मयावर अडविण्याची सूचना केली जाते. चौकशीअंती या वाहनात कसल्याच प्रकारचे सोने मिळत नाही. तरीही गेल्या साडेचार महिन्यांपासून या प्रकरणी वेगवेगळय़ा घडामोडी सुरू आहेत.
स्वतः वरिष्ट पोलीस अधिकाऱयांनीच किरणच्या मदतीने कारमधील 4 किलो 900 ग्रॅम सोन्याची परस्पर विक्री केल्याच्या या प्रकरणाने पोलीस दलाच्या अबूचे धिंडवडे निघाले आहे. पैसे व सोन्याच्या दागिन्यांच्या हव्यासापोटी वरिष्ट पोलीस अधिकारीच चोरी करण्यास उतरले आहेत. याचा अर्थ पोलीस दलात सगळेच वाईट आहेत, असा नाही. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर अनेक अधिकारी चिंतित आहेत. एका चोर प्रवृत्तीच्या अधिकाऱयामुळे संपूर्ण पोलीस दल बदनाम होत आहे, याची त्यांना काळजी वाटत आहे.
गेल्या तीन दिवसांपासून तरुण भारतमध्ये या प्रकरणाचा सविस्तर भांडाफोड करण्यात येत आहे. हे प्रकरण कसे घडले, या प्रकरणात कोणत्या अधिकाऱयांचा सहभाग आहे, कुंपणानेच शेत खाल्ल्याच्या प्रकरणामुळे पोलीस दलाच्या प्रतिमेला तडा गेला आहे. बेळगावच्या नशिबी चोर प्रवृत्तीचे अधिकारीच का येतात? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
सध्या सीआयडीचे डिटेक्टिव्ह पोलीस उपअधीक्षक राघवेंद्र हेगडे यांच्याकडे या प्रकरणाच्या चौकशीची जबाबदारी आहे. तब्बल चार दिवस बेळगाव, यमकनमर्डी, हत्तरगी परिसरात भेटी देऊन अधिकाऱयांनी या प्रकरणाची माहिती जमविली आहे. सध्या हे प्रकरण दडपण्यासाठी हुबळीचा दलाल व वरिष्ट पोलीस अधिकाऱयांनी आपली ताकद पणाला लावली आहे. दबावाला बळी पडून या प्रकरणावर पडदा टाकला तर सर्वसामान्यांचा पोलीस दलावरचा विश्वास उडून जाणार आहे.
गेले दोन दिवस या प्रकरणाचा प्रमुख सूत्रधार किरण वीरनगौडर हा पोलीस महानिरीक्षक राघवेंद्र सुहास यांच्यासमवेत उभा असलेले एक छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. या छायाचित्राची जोरदार चर्चा होत आहे. पोलिसांच्या ताब्यात असलेल्या वाहनातील सोने चोरून विकणाऱया दलालाची वरिष्ट अधिकाऱयांबरोबर दोस्ती कशी, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
संपूर्ण राज्याचे लक्ष वेधणाऱया या प्रकरणी अद्याप साधे एफआयआरही दाखल झालेले नाही. केवळ एका तक्रारीवरून सीआयडी चौकशी सुरू आहे. एफआयआर दाखल झाले नाही तर चोर मोकाट सुटणार आहेत. हुबळीत वरिष्ट अधिकाऱयांनीच 4 किलो 900 ग्रॅम सोने गिळल्याने हे प्रकरण दडपण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू असून गृहमंत्री बसवराज बोम्मई व राज्य पोलीस महासंचालक प्रवीण सूद आदी वरिष्ठांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतल्यामुळे कारवाई होणार, अशी आशा निर्माण झाली असली तरी मंगळूरच्या सराफी व्यावसायिकाचे 4 किलो 900 ग्रॅम सोने मिळणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात असून एक-दोन दिवसांत या प्रकरणाच्या चौकशीला गती मिळणार आहे.
इतरही अधिकारी अडचणीत?
हे प्रकरण उघडकीस आल्यानंतरही काही पोलीस अधिकारी या दलालाच्या सतत संपर्कात आहेत. सोने चोरी प्रकरणात ठळक चर्चेत असणारा किरण हा निवृत्त पोलीस अधिकाऱयाचा मुलगा असून अशा अनेक प्रकरणात त्याच्या नावाची चर्चा असते. बडय़ा पोलीस अधिकाऱयांशी मैत्री करून मांडवली करण्यात तो आघाडीवर असतो. त्याच्या संपर्कात असणाऱया आणखी काही पोलीस अधिकाऱयांच्याही अडचणी वाढणार असून त्याच्या मुसक्मया आवळल्यानंतर धक्कादायक माहिती उघडकीस येण्याची शक्मयता आहे.
नवे आयजीपी एन. सतीशकुमार यांनी सूत्रे स्वीकारली
बेळगाव उत्तर विभागाचे पोलीस महानिरीक्षक राघवेंद्र सुहास यांच्या तडकाफडकी बदलीनंतर रिक्त झालेल्या पदावर एन. सतीशकुमार यांची नियुक्ती करण्यात आली होती. रविवारी ते बेळगावात दाखल झाले असून त्यांनी सूत्रे स्वीकारली आहेत, अशी माहिती मिळाली आहे.