प्रतिनिधी/सातारा
राज्य शासनाने किरानी मालाच्या दुकानांची वेळ सकाळी 7 ते 11 पर्यंत केली आहे. पण जिल्हा प्रशासनाने मात्र सायंकाळी 6 पर्यंतची वेळ कायम ठेवली आहे. तरी आता वेळेत बदल झाल्याने सकाळी 11 नंतर किरानी मालाची दुकाने बंद होण्याच्या अफवा पसरल्या होत्या. त्यामुळे कित्तेक नागरिकांनी गरजेच्या सामानाची खरेदी अगदी सकाळी जाऊन केली.
त्यामुळे सकाळच्या दरम्यान मंगळवारी जीवनावश्यक साहित्य खरेदी करीता गर्दी दिसुन आली होती. दुपार नंतर दुकाने बंद होणार म्हणून नागरिकांनी दुकानांमध्ये एकच गर्दी केली होती. पण जिल्हा अधिकाऱयांनी सायंकाळी 6 पर्यंत किरानी मालाची दुकाने सुरू ठेवण्यास परवाणगी दिली आहे. काही विक्रेत्यांमध्ये ही संभ्रम निर्माण झाल्याने कित्तेकांनी आपली दुकाने सकाळी 11 नंतर बंद ठेवली होती.
वॉटस्ऍप च्या माध्यमातुन फिरणाऱया मेसेज व राज्य सरकारने लागु केलेल्या नियम हे साताऱयात देखिल लागु आहेत या अंदाजाने काहींनी दुकाने बंद ठेवली. विनाकारण दंड ठोठावण्यात येऊ नये या भिती पोटी ही दुकाने बंद ठेवण्यात आली होती. पण या केवळ अफवा असल्याचे नंतर त्या विक्रेत्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवु नये असे, प्रशासनातर्फे सांगण्यात येत आहे.