सातारा :
सध्या जिल्हा प्रशासनाने लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्यक सेवेसाठी दिवसभर खुली असलेली दुकाने व त्याच कारणाने शहरात लोकांची होणारी वर्दळ टाळण्यासाठी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दुकानांसाठी सकाळी 8 ते 11 व सायंकाळी 7 ते 9 अशी वेळ दिली आहे. अर्थातच याचा फायदा झाला असून दिवसभर होणारी वर्दळ कमी झाली आहे. रस्ते पुन्हा सुनसान झाले मात्र सायंकाळी 7 वाजताच लोक पुन्हा विविध करणासाठी रस्त्यावर दिसू लागले. किराणा माल, मेडिकल दुकानात गर्दी होऊ लागली. मात्र शासन नियमाप्रमाणे या दुकानदारांनी सोशल डिस्टन्सचे पालन करावे, अश्या सूचना दिल्याप्रमाणे किमान 3 ते 4 फुटाचे अंतर ठेवून सर्व ग्राहक उभे होते. तर काही ठिकाणी किराणा दुकानदारांनी ग्राहकांना नंबर दिले. त्याप्रमाणे एक एक ग्राहकांना किराणा विक्री केली जात होती.