प्रतिनिधी/ बेळगाव
दसरा दिवाळीची सुट्टी पडली कि बालचमुंना वेध लागतात ते किल्ले तयार करण्याचे. मातीपासून मेहनतीने बालचमू युवक हे किल्ले तयार करत असतात. परंतु यावषी मागील काही महिन्यांपासून शाळा बंद असल्यामुळे एक विरंगुळा म्हणून किल्ले तयार केले जात आहेत. गल्लोगल्ली किल्ले तयार करण्यामध्ये मग्न असणारे बालचमू सर्वत्र दिसत आहेत. या किल्ल्यांसाठीचे मावळे व इतर साहित्य विक्रीसाठी बेळगाव शहर व परिसरात दाखल झाले आहे.
शहरातील मारुती गल्ली, किर्लोस्कर रोड, शहापूर खडेबाजार, वडगाव रोड, अनगोळ, टिळकवाडी या परिसरात किल्ल्यांसाठीचे साहित्य विक्री करण्यास ठेवण्यात आले आहे. 30 रुपयांपासून मावळे तर 200 रुपयांपासून छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे विक्री केल्या जात आहेत. बेळगाव शहर व परिसरात अनेक संघटना किल्ला स्पर्धा भरवित असतात. यातून युवा पिढीपर्यंत इतिहास पोहोचावा हा हेतू असतो. परंतु यावषी कोरोनामुळे बऱयाच मंडळांनी स्पर्धा रद्द केल्या आहेत.
किल्ल्यांसोबत मावळय़ांचीही मागणी
बालचमू युवक किल्ल्यांविषयी आता अधिक माहिती घेत आहेत. त्यामुळेच त्या त्या किल्ल्यांवरील इतिहासानुसार त्याच प्रकारचे मावळे खरेदी केली जात आहेत. त्यामुळे बाजीप्रभू देशपांडे, तानाजी मालुसरे अशा मावळय़ांना मागणी सर्वाधिक आहे. काहींना किल्ले तयार करणे शक्मय नसल्यामुळे तयार किल्ले देखील उपलब्ध करून देण्यात आले आहेत. दोन फुटांपासून चार फुटांपर्यंत हे तयार किल्ले बाजारात उपलब्ध आहेत.
प्रसाद हुंदरे
दरवषी शाळांना दसरा व दिवाळीच्या दरम्यान सुट्टी असते. परंतु यावषी मागील सात महिन्यांपासून कोरोनाची सुट्टी असल्याने यावषी किल्ला करणाऱयांची संख्या वाढली आहे. शिवाजी महाराजांच्या मूर्तीसोबतच मावळे, सैनिक, किल्ले यांची विक्री वाढली असल्याचे त्यांनी सांगितले.
अमोल पुजारी
यावषी कोरोनाचे सावट असल्याने बाहेरून खरेदीसाठी येणाऱयांची संख्या कमी आहे. यामुळे यावषी साहित्य मोठय़ाप्रमाणात मागविण्यात आले नाही. मागील वषीच्या तुलनेत दरही स्थिर आहेत. बेळगाव व परिसरातील बालचमू मात्र मागील आठवडय़ाभरापासून खरेदीसाठी गर्दी करीत आहेत, असे त्यांनी सांगितले..