प्रतिनिधी/ भुईंज
किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याच्या इथेनॉल प्रकल्पात तयार करण्यात आलेल्या इथेनॉलचा पेट्रोलियम कंपन्यांना सोमवारपासून पुरवठा सुरू करण्यात आला. त्याचा प्रारंभ कारखान्याचे उपाध्यक्ष गजानन बाबर, संचालक मधुकर शिंदे, इन्चार्ज डिस्टीलरी मॅनेजर यु. के. जाधव व हणमंतराव गायकवाड यांच्या हस्ते टँकरचे विधिवत पुजन करण्यात आले.
किसन वीर कारखान्याचे अध्यक्ष मदनदादा भोसले यांच्या दुरदृष्टीतुन कारखाना कार्यस्थळावर शेतकरी वर्गाचे हित डोळ्यासमोर ठेऊन साखरेसह पुरक उद्योगांची जोड देऊन सभासद शेतकर्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करीत आहेत. केंद्र सरकारने इथेनॉलबाबत घेतलेले सकारात्मक धोरण, इथेनॉलला मिळणारा योग्य दर व शाश्वत बाजारपेठ उपलब्ध होत आहे. कारखान्यास या हंगामाकरिता इथेनॉल पुरवठा करण्याची मंजुरी मिळालेली आहे. त्यानुसार हिंदुस्थान पेट्रोलियम कार्पोरेशन लि.,इंडियन ऑईल कार्पोरेशन आणि भारत पेट्रोलियम या कंपन्यांना प्रकल्पातून निर्माण झालेल्या इथेनॉलचा पुरवठा करण्यात येणार आहे. कारखान्यावर सध्या प्रतिदिन एँंशी हजार लिटर क्षमतेचा इथेनॉल प्रकल्प असून तो पुर्ण क्षमतेने सुरू आहे.