प्रतिनिधी/ बेळगाव
देशातील तिसरी व कर्नाटकातील पहिली किसान रेल्वे बेंगळूर ते हजरत निजामुद्दीन मार्गावर धावली. प्रत्येक शनिवारी या मार्गावर ही रेल्वे धावत असून, रेल्वेने आपल्या तिसऱया फेरीत शनिवार दि. 3 रोजी 56.54 टन कृषी उत्पादनाची वाहतूक केली आहे. नैर्त्रुत्य रेल्वे विभागातून कृषी उत्पादने व पार्सल घेऊन ही रेल्वे दिल्लीला रवाना झाली.
यापूर्वी ही किसान रेल्वे बेंगळूर ते हजरत निजामुद्दीन या मार्गावर धावत होती. आता निजामुद्दीनच्या पुढे आदर्श नगरपर्यंत धावणार आहे. या रेल्वेमध्ये बेंगळूरमध्ये 55 टन साहित्य भरण्यात आले. म्हैसूर विभागात 1.21 टन, तर हुबळी विभागात मासे, सुके खोबरे व खाऊची पाने असे एकूण 140 किलो तर 190 किलो साहित्य बेळगावमध्ये भरण्यात आले आहे.
पहिल्या फेरीत किसान रेल्वेने 38 टन तर दुसऱया फेरीत एकूण 81 टन मालाची वाहतूक केली होती. शेतकऱयांचा कृषी माल कमी वेळेत व कमी वाहतूक खर्चात पोहोचावा यासाठी ही रेल्वे सुरू करण्यात आली असल्याचे रेल्वे विभागाने कळविले आहे.