प्रतिनिधी/ बेळगाव
शेतकऱयांचे कृषी उत्पादन दुसऱया राज्यांमध्ये पोहोचविण्यासाठी सुरू करण्यात आलेली किसान रेल्वे रविवारी सकाळी 8.30 च्या सुमारास बेळगावमध्ये दाखल झाली. देशातील तिसरी व कर्नाटकातील पहिली किसान रेल्वे बेंगळूर ते हजरत निजामुद्दीन मार्गावर धावत आहे. या रेल्वेमध्ये बेळगावमधुन कृषी माल उत्तर भारतात पाठविण्यात आला.
लॉकडाऊन नंतर रेल्वेने पार्सल व कृषी मालासाठीची किसान रेल्वे यावर भर दिला. अल्प दरात शेतकऱयांनी पिकविलेला भाजीपाला, फळे, दूध, व इतर उत्पादने दुसऱया राज्यांमध्ये विक्री केली जाणार आहेत. यामुळे स्थानिक शेतकऱयांना देशाची बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. रविवारी ही रेल्वे बेळगावमध्ये दाखल झाली. बेळगावमधून या रेल्वेमध्ये साहित्य भरण्यात आले.
हुबळीतून 719 पानाच्या बुटय़ा रवाना
बेंगळूर ते निजामुद्दीन मार्गावर धावणाऱया या रेल्वेमध्ये विविध स्थानकांवर माल चढविण्यात व उतरविण्यात येत होता. हुबळी येथे 719 पानाच्या बुटय़ा या डब्यामध्ये घालण्यात आल्या. या बरोबर बेळगावमधून 30 टन विविध कृषिमाल या रेल्वेमध्ये भरण्यात आला होता.