वार्ताहर / माशेल
मानसवाडा पुंडई येथे मालवाहू ट्रक कारगाडीवर उलटून झालेल्या भिषण अपघातात कॅबिनमध्ये अडकलेला कारचालक यतीन विष्णू वारंग हा जागीच ठार झाला होता. त्याच्या अकाली मृत्यूने तिवरे गावावर शोककळा पसरली आहे. काल शुक्रवारी सायंकाळी अंत्यत शोकाकुल वातावरणात त्याच्या पार्थिवावर अंतिमसंस्कार करण्यात आले.
मयत यतीन यांचे मूळ घर कुंभारजुवे येथे असून वडिल विष्णू हे एमपीटी येथून सेवानिवृत्त झाल्यानंतर सदर कुटुंबिय तिवरे येथे स्थायिक झाले आहे. त्याला दोन विवाहित बहीण, पत्नी तसेच चार वर्षाचा मुलगा असा परिवार आहे. यतीन हा पेशाने अभियंता असून त्याचा स्वतःचा व्यवसाय होता. त्याची पत्नी संगीत शिक्षण म्हणून पणजी येथे कामाला आहे. मयत यतीन हा कुंडई, बाणस्तारी भागात सर्वांना परिचीत होता. त्याने आपल्या हसऱया स्वभवामुळे मित्रही भरपूर जोडले होते. कुटूबिंयावर आकस्मिक ओढावलेल्या परिस्थितीवर मित्रपरिवाराकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या मालवाहू ट्रकचालक मदन गोपाळ रासवा (39,मूळ राजस्थान) याच्याविरोधात भां द.सं. 279, 134 ए कलमाखाली गुन्हा नोंदवून अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी उपनिरीक्षक आदित्य वेळीप अधिक तपास करीत आहे.