ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
यूएई आणि ओमान येथे होणाऱया आयसीसी टी-20 विश्वचषकानंतर टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा कार्यकाळ संपुष्टात येणार आहे. त्यामुळे बीसीसीआय नव्या मुख्य प्रशिक्षकाच्या शोधात आहे. भारतीय क्रिकेट बोर्ड प्रसिद्ध माजी फिरकीपटू अनिल कुंबळे आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांना मुख्य प्रशिक्षक पदासाठी अर्ज करण्यास सांगू शकते. व्हीव्हीएस लक्ष्मण यासाठी अर्ज करण्यास इच्छुक आहेत की नाही हे अद्याप समोर आले नाही. मात्र, कुंबळेने मुख्य प्रशिक्षक होण्यास सहमती दर्शविली आहे.
अनिल कुंबळेला 2016 मध्ये भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक बनविण्यात आले होते. सचिन तेंडुलकर, लक्ष्मण आणि गांगुलीच्या अध्यक्षतेखालील क्रिकेट सल्लागार समितीने कुंबळेला शास्त्रांrच्या जागी नियुक्त केले होते. परंतू, संघात कुंबळेविरोधात काही कारस्थान रचण्यात आले. यानंतर कुंबळेने राजीनामा दिला होता. दरम्यान, त्यावेळी टीम इंडियाने 2017 मध्ये चॅम्पयिन्स ट्रॉफीची अंतिम फेरी गाठली होती. मात्र, अंतिम सामन्यात भारताला पाकिस्तानकडून पराभव पत्करावा लागला.
कुंबळे सध्या आयपीएल संघ पंजाब किंग्जचा मुख्य प्रशिक्षक आहे. कुंबळेशी संपर्क साधण्यापूर्वी बीसीसीआयने श्रीलंकेच्या महेला जयवर्धनेशी संपर्क साधला होता, असे म्हटले जाते.