तृणमूल काँग्रेसचे उमेदवार समिल वळवईकर यांचे प्रतिपादन
प्रतिनिधी /तिसवाडी
या निवडणुकीत सर्व मतदारांना बदल हवा असून तो ऐतिहासिक बदल घडविण्यासाठी त्यांनी आपल्याला विजयी करण्याचा निर्धार केला आहे, ही माझ्यासाठी खूप महत्वाची बाब आहे. हा बदल घराणेशाही संपविण्यासाठी, निष्क्रियता संपविण्यासाठी आणि रोजगार निर्मितीसाठी, खाजनांच्या सवर्धनासाठी तसेच आरोग्य, शिक्षण, कला, संस्कृती, क्रीडा क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी असेल, असे तृणमूल काँग्रेसचे उमेदवार समिल वळवईकर यांनी सांगितले.
काल मंगळवारी त्यांनी धुळापी येथे घरोघरी प्रचार केला. त्यानंतर कॉर्नर सभा घेतली. यावेळी ते म्हणाले आपणस मतदारसंघातील सर्व मतदारांकडून उस्फूर्त प्रतिसाद लाभला. त्यांच्यासोबत अनेक कार्यकर्ते फिरताना दिसले. यावेळी झालेल्या कोपरा बैठकीत समिल वळवईकर म्हणाले की पांडुरंग मडकईकर यांना आम्ही सर्वांनी आमदार म्हणून पाचवेळा निवडून दिले, त्यांना मंत्रीपद मिळूनही त्यांनी गेली पाच वर्षे वाया घालविली. सत्तेत राहूनही ते काहीच विकास करु शकले नाही. त्यांनी त्यामुळे आमचा कुंभारजुवे मतदासंघ दहा वर्षे मागे पडला आहे.
मडकईकर घराण्याने कोरोना काळात मतदारांना वाऱयावर सोडले म्हणून माझ्यासारखा सामान्य कार्यकर्ता तसे करु शकत नव्हता. गरीब, सामान्य जनतेच्या समस्या, दुःख काय असते याची जाणीव आहे. मतदारांना शक्य तेवढा आधार आपण माझ्या कार्यकर्त्यांमार्फत देण्यात यशस्वी ठरलो. सर्व स्तरांतील लोकांचे आपल्याला आशीर्वाद मिळाले आणि त्यांच्या विनंतीनुसारच आपण निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला, आणि आता माझे कार्यकर्ते, मतदार यांच्या पाठिंब्यावरच मी विजयी होणार असून त्यांच्याशी कधीही विश्वासघात करणार नाही, असेही समिल म्हणाले.
मतदारंघातील ओल्ड गोवा, गोलती-नावेली, सां मातियश, खोर्ली, करमळी, कुंभारजुवे, सांत इस्तेव्ह-आखाडा या सातही पंचायतींमधून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असणारा आपण एकमेव उमेवादर आहे. कोरोनाच्या तिन्ही लाटांमध्ये जीवाची पर्वा न करता आपले कार्यकर्ते व आपण लोकांची मदत करु शकलो. बहुतांश आजी-माजी सरपंच, पंच, समाजकार्यकर्ते आपल्या विजयासाठी झटत आहेत. सर्व धर्म, जाती, संपद्राय, समूदायातील युवक, युवती, महिलावर्ग मोठय़ा प्रमाणात आपल्याबरोबर आहे. आपण मतदारसंघातील स्थानिक रहिवासी असल्याने लोकांची पहिली पंसती मिळत आहे. अन्य पक्षांचे कार्यकर्तेही आपल्यासाठी झटत असून त्यांचे मतदारही आपल्या संपर्कात आहेत. मतदारांना कलंकित नव्हे, तर स्वच्छ आमदार हवा आहे. घराणेशाहीला उलथवून टाकायचे आहे. या सर्वाचा परिणाम म्हणून आपला विजय निश्चित झाला आहे. खाजनसह शेतीला सर्वतोपरी सहकार्य करणार आहे. ओल्ड गोव्याचा कचरा प्रकल्प रद्द करणार असून खोर्ली औद्योगिक वसाहतीचा विकास करुन त्यात कुंभारजुवे मतदारसंघातील लोकानाच प्राधान्य मिळैल, यासाठी आपण प्रयत्न करणार असे ते म्हणाले.