वाळपई /प्रतिनिधी
सत्तरी तालुक्मयातील गोळवली या ठिकाणी वाघांच्या मृत्यूनंतर पावणे कुटुंब यापैकी पाच जणांना संशयित म्हणून अटक करण्यात आल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांसह निर्माण झालेली परिस्थिती यांच्या पार्श्?वभूमीवर आज सत्तरी तालुक्मयाच्या उपजिल्हाधिकारी यांनी विविध खात्यांच्या प्रमुख अधिकाऱयांसमवेत घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी करून घेतली. यावेळी त्यांनी आरोग्य, संरक्षण ,नागरी पुरवठा या सुविधा दारापर्यंत उपलब्ध करण्याचे निर्देश विविध खात्यांच्या अधिकाऱयांनी देण्यात आलेले आहेत. त्याचप्रमाणे शिक्षणासाठी मुलांची कोणत्या प्रकारे परवड होणार नाही याची विशेष दखल घेत संदर्भात मुलांसाठी वाहतूक व्यवस्था करण्याचे निर्देश सत्तरी तालुक्मयाच्या भागशिक्षणधिकाऱयाना देण्यात आले आहेत .यामुळे गेल्या काही दिवसांपासून विविध वर्तमानपत्रात सदर कुटुंबीयांची परवड यांच्या शीर्षकाखाली प्रसिद्ध होणाऱया मजुराचे उपजिल्हाधिकारी मंगलादास गावकर यांनी विशेष दखल घेतल्याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. त्याचप्रमाणे या संदर्भात निवेदन स्थानिक ठाणे पंचायत मंडळातर्फे उपजिल्हाधिकाऱयांना सोमवारी संध्याकाळी देण्यात आले होते.
याबाबतची माहिती अशी की 5 जानेवारीपासून येथील वाघांचा मृत्यू संदर्भाचे प्रकरण प्रचंड प्रमाणात गाजत आहे. यासंदर्भात आतापर्यंत पाच जणांना अटक करण्यात आली असून सदर संशयित आरोपी हे पावणे कुटुंबातील असल्याने सध्यातरी गोळवली धनगरवाडा या ठिकाणी तीन घरात फक्त महिलाच राहत असून ?रुष मंडळी कोठडीत असल्यामुळे विचित्र स्वरूपाच्या समस्या निर्माण झालेली आहे. त्यामुळे सध्यातरी उदरनिर्वाहासाठी कुटुंबांना संघर्ष करावा लागत असून मानवी दृष्टिकोनातून या कुटुंबांना सरकारने विविध स्तरावर मदत करावी अशा प्रकारची मागणी करीत वर्तमानपत्राने हा विषय लावून धरला होता. त्याचप्रमाणे ठाणे पंचायतीतर्फे सत्तरी तालुक्मयाच्या उपजिल्हाधिकाऱयांना निवेदन सादर करून वेगवेगळे स्तरावरून त्यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता. याची दखल घेत उपजिल्हाधिकारी मंगला गावकर यांनी मंगळवारी सकाळी विविध खात्याच्या प्रमुख अधिकाऱयांसमवेत भागांमध्ये भेट देऊन एकूण परिस्थितीची जाणीव करून घेतली. यावेळी सदर ठिकाणी वेगवेगळय़ा समस्या व ज्या पद्धतीने पावणे कुटुंबीय सदर ठिकाणी राहत आहेत त्यासंदर्भातील परिस्थिती पाहून त्यांचेही मन हेलावले.
शिक्षणाबाबत बाबतीत तडजोड नाही
दरम्यान सदर घराण्यातील पाच जणांना संशयित म्हणून अटक करण्यात आल्यानंतर या कुटुंबातील दोन मुले यांची शिक्षणाची परवड झाली आहे .एक मुलगी अकरावीला शिकत असून दुसरा मुलगा सातवीमध्ये शिकत आहे .मात्र त्यांना शाळेमध्ये पोचविण्यासाठी त्यांचे वडील नसल्याने गेल्या सहा दिवसांपासून त्यांनी शाळेत जाणे बंद केले आहे. गोळवली गावापासून त्यांची घरे जवळपास अडीच किलोमीटरवर असून हा संपूर्ण भाग घनदाट जंगलात असल्यामुळे जनावरांच्या भीतीपोटी चालत जाणे अत्यंत धोक्मयाचे आहे. त्यामुळे सदर मुले शाळेत जात नाहीत या संदर्भात उपजिल्हाधिकारी मंगलदास गावकर यांनी सत्तरी तालुक्मयाचे भाग शिक्षणाधिकारी भालचंद्र भावे यांना त्यांच्या शिक्षणाची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले आहेत .यामुळे सकाळी पोलिसांच्या वाहनाच्या माध्यमातून त्यांना गोळवली याठिकाणी पोचविण्यात येणार आहे. यामुळे बुधवारपासून सदर मुले शाळेत जाण्यास सुरुवात करतील अशा प्रकारची व्यवस्था करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.
धान्याचा कोटा अधिक पुरविण्याचे आदेश
दरम्यान सदर कुटुंबासह निर्माण झालेले उदरनिर्वाहाची समस्या यांच्या पार्श्वभूमीवर त्यांना प्राप्त होणारा धान्याचा कोटा त्याच्यापेक्षा अतिरिक्त कोटा त्यांना पुरविण्यात यावा अशा प्रकारचे आदेश नागरी पुरवठा निरीक्षक दर्शन आर्लेकर यांना देण्यात आलेले आहे. यावेळी सत्तरी तालुक्मयाच्या मामलेदार अनिल राणे यांनीही या संदर्भात विशेष लक्ष द्यावे अशा प्रकारचे आदेश देण्यात आलेले आहे .त्यांना सदर धान्याचा कोटा घरी पोचविण्यात येईल अशा प्रकारचे मदत या खात्यातर्फे करण्यात येईल अशा प्रकारचे मदत खात्यातर्फे करण्यात येईल अशा प्रकारचे आश्वासन दर्शन आर्लेकर यांनी दिले आहे.
आरोग्यसुविधा दररोज प्राप्त होणार
दरम्यान घरातील मंडळीची संशयित आरोपी म्हणून अटक करण्यात आल्यानंतर त्याचा मानसिक धक्का बसून अनेक जण आजारी पडले आहेत. त्यामुळे त्यांना आरोग्याच्या सुविधा सोमवारपासून उपलब्ध झालेल्या आहेत. आजही वाळपई सामाजिक रुग्णालयाचे आरोग्य अधिकारी डॉक्टर गजानन नाईक आकिब शेख विराज सावंत यांनी विशेष पथकही भेट देऊन संपूर्ण कुटुंबाची तपासणी केली. त्याबरोबर त्यांना औषधे देण्यात आली असून येणाऱया काही दिवसात दररोज या सुविधा उपलब्ध करण्यात येणार अशा प्रकारचे आदेश जिल्हाधिकाऱयांनी दिलेल्या आहेत.
संरक्षण देण्याचे आदेश
दरम्यान सदर कुटुंबीय सध्यातरी एका भयभीत स्वरूपात राहत आहेत. रात्रीसुद्धा एक विचित्र स्वरूपाचा भय निर्माण झालेला आहे .सदरची घरे पूर्णपणे जंगलात राहत असल्यामुळे स्वरूपाच्या त्याच्या पार्श्वभूमीवर त्यांना पोलिस संरक्षण देण्याची मागणी सोमवारी झालेल्या निवेदनातून करण्यात आली होती .याची गंभीर दखल घेत पोलीस निरीक्षक शिवराम वायंगणकर यांनी सोमवारी संध्याकाळी पासून पोलिस तैनात करण्यात आलेले आहे. सोमवारी रात्री एकूण तीन पोलिस संरक्षणासाठी ठेवण्यात आले होते ही प्रक्रिया येणाऱया काळातही सुरूच राहणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
यावेळी उपजिल्हाधिकारी यांबरोबर समाज संघटनेचे अध्यक्ष बि डी मोटे व इतर समाज प्रतिदिनी सविस्तरपणे चर्चा केली
कुटुंबाची तयारी असल्यास स्थलांतराचा विचार
दरम्यान यासंदर्भात उपजिल्हाधिकारी मंगलदास लवकर याना स्थलांतरास संदर्भात विचारले असता सध्या तरी सदर कुटुंबीय अनेक वर्षापासून धनगरवाडा याठिकाणी वास्तव्य करीत आहेत .सध्या निर्माण झालेली विचित्र स्वरूपाची परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर त्याच्या स्थलांतराचा विचार आहे का या संदर्भात विचारले असता त्यांनी सांगितले की सदर कुटुंबीयांची इतर ठिकाणी स्थलांतर करण्यास तयार असल्यास या संदर्भात गोवा सरकार विचार करणार आहे. मात्र यासाठी त्यांची तयारी असणे अत्यंत गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
नखांच्या शोधासाठी सिद्धेश्वराला साकडे.
जर्मन याबाबत मिळालेल्या माहितीनुसार वाघाच्या मृत्यूनंतर एका वाघाची गायब झालेली नखे वेगवेगळय़ा स्तरावर चौकशी करूनही सापडत नाहीत .यामुळे गोळवली गावातील श्रद्धास्थान मानल्या जाणाऱया सिद्धेश्वराला साकडे घालण्याचा प्रयत्न सोमवारी रात्री भागातील गावकऱयांनी केल्याची माहिती हाती आली आहे. सध्यातरी वाघाच्या मृत्यूमुळे गोळवली गावात मोठय़ा प्रमाणात चिंतेचे सावट पसरले आहे. दररोज चौकशीसाठी येणारी पोलीस वनखात्याची यंत्रणा यामुळे भागांमध्ये भयावह परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्याच्या पार्श्वभूमीवर सदर नखांचा शोध लवकरात लवकर लागावा यासाठी सिद्धेश्वराला साकडे घालण्यात आले.