सरकारने ताबडतोब नुकसान भरपाई देण्याची मागणी.
वाळपई / प्रतिनिधी
बुधवारी मोठय़ा प्रमाणात वादळी वाऱयाचा व पावसाचा फटका बसून कुडशे येथील शामू कुडशेकर यांच्या घराची मोठय़ा प्रमाणात नुकसानी झाली आहे. जवळपास एक लाखाच्या आसपास नुकसान होण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे .
त्याचप्रमाणे म्हादई नदीच्या पाण्यात वाढ होऊन घरामध्ये पाणी घुसून घरातील वस्तूंची मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे सरकारने याची गंभीर दखल घेऊन ताबडतोब याकुटुंबाला नुकसानभरपाई देण्याची व्यवस्था करावी अशा प्रकारची मागणी कुटुंबाने केली आहे. त्याचप्रमाणे वाळपई काँग्रेस समितीतर्फे सरकारने या कुटुंबाची गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन शक्मय तेवढय़ा लवकर नुकसानभरपाई देण्याच्या संदर्भात व्यवस्था करावी अशा प्रकारची मागणी केली आहे.
याबाबतची माहिती अशी की शामू कुडशेकर यांचे घर म्हादई नदीच्या पात्रापासून अवघ्याच अंतरावर आहे. गेल्या वषी अशाच परिस्थितीत पाण्याची पातळी वाढल्यामुळे त्याच्या घरामध्ये पाणी घुसले होते. यामुळे बऱयाच प्रमाणात नुकसानी झाली होती. गेल्या वषीची नुकसान भरपाई अजूनही मिळालेले नाही. बुधवारी अशाच अवस्थेत पडलेल्या पावसामुळे पुन्हा एकदा घरांमध्ये पाणी घुसले व घरातील सामानाची मोठय़ा प्रमाणात नुकसानी झाली आहे. त्याचप्रमाणे घराशेजारी नवीनच काढलेल्या एका खोलीची प्रचंड प्रमाणात नुकसान झालेली आहे. भिंती व छप्पर कोसळले असून जवळपास एक लाखाच्या आसपास नुकसान होण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. श्यामू कुडशेकर यांनी यावेळी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना कुटुंबाची एकूण आर्थिक परिस्थिती संदर्भात माहिती दिली. आपण बँकेतून कर्ज काढून घर बांधले होते. गेल्यावषी आपल्याला बऱयाच प्रमाणात नुकसान झाले. यंदाही मोठय़ा प्रमाणात नुकसान झाल्यामुळे कुटुंबात समोर गंभीर स्वरूपाची परिस्थिती निर्माण झाल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. सध्यातरी वाळपई मामलेदार कार्यालयातील अधिकाऱयांनी भेट देऊन या संदर्भाचा पंचनामा केलेला आहे. अशा प्रकारचा पंचनामा गेल्या वषी केला होता .मात्र अजूनपर्यंत एकही रुपयाची नुकसान भरपाई आलेली नसून यंदातरी सरकारने आमच्यावर कृपा करावी अशा प्रकारची मागणी या कुटुंबाने केली आहे. दरम्यान वाळपई काँग्रेस समितीच्या कार्यकर्त्यांनी सदर ठिकाणी भेट देऊन एकूण परिस्थितीची पाहणी केली. यागरीब कुटुंबाला आज हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगावे लागत असून सरकारने याची गंभीर दखल घेऊन प्राधान्याने नुकसान भरपाई देण्याची व्यवस्था करावी अशा प्रकारची मागणी दशरथ मांदेकर यांनी केली आहे.