भातशेतीचे मोठे नुकसान : कृषीमंत्र्यांच्या आदेशानुसार पंचनामे सुरू
प्रतिनिधी / कुडाळ:
आमदार वैभव नाईक यांच्या मागणीनुसार कृषीमंत्री दादा भुसे यांनी दिलेल्या आदेशानुसार सिंधुदुर्ग जिल्हय़ात भातशेतीच्या नुकसानीचे पंचनामे सुरू झाले आहेत. शुक्रवारी सकाळी आमदार नाईक यांनी तहसीलदार अमोल पाठक, कुडाळ तालुका कृषी अधिकारी रमाकांत कांबळी यांच्यासमवेत पावसामुळे नुकसान झालेल्या तालुक्मयातील भातशेतीच्या पंचनाम्यांचा आढावा पावशी गावात घेतला. तसेच तेथील भातशेतीची पाहणी केली.
सिंधुदुर्ग जिल्हय़ात गेले काही दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे. भातशेती जमीनदोस्त झाली असून भाताला कोंब फुटले आहेत. याबाबत आमदार नाईक यांनी मुंबई येथे मंत्रालयात कृषीमंत्री भुसे यांची भेट घेऊन पावसामुळे भातशेतीच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱयांना नुकसान भरपाई मिळवून देण्याची मागणी केली होती. त्यानुसार भुसे यांच्या आदेशानुसार सिंधुदुर्ग जिल्हय़ात भातशेतीच्या नुकसानीचे पंचनामे सुरू झाले आहेत. आमदार नाईक यांनी तहसीलदार व तालुका कृषी अधिकारी यांच्यासमवेत तालुक्मयातील भातशेतीच्या पंचनाम्यांचा आढावा घेतला.
पावशी गावात पाहणी
पावशी गावात भातशेतीच्या केलेल्या पाहणीवेळी त्यांनी तहसीलदार, कृषी अधिकारी व तलाठी यांना तालुक्मयातील भातशेतीचे पंचनामे तात्काळ पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. तसेच शासनाकडून नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले.
726 हेक्टर जमिनीवरील शेतीचे पंचनामे पूर्ण
नजर अंदाजानुसार तालुक्मयातील 1436 शेतकऱयांच्या 726 हेक्टर जमिनीवरील शेतीचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. उर्वरित पंचनामे येत्या पाच ते सहा दिवसांत पूर्ण केले जाणार आहेत, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी यांनी दिली.
संयुक्तरित्या पंचनामे करण्याच्या सूचना
नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे तात्काळ पूर्ण करण्यासाठी तलाठी, ग्रामसेवक व कृषीसेवक यांना संयुक्तरित्या पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या जाणार असल्याचे तहसीलदारांनी सांगितले.
भातशेती पूर्णतः जमीनदोस्त
भातशेती पूर्णतः पिकून जमीनदोस्त झालेली व त्यावरून पाणी वाहत असल्याचे चित्र दिसून आले. ठिकठिकाणी भाताला कोंब फुटलेले दिसून येत होते. पावशी सरपंच बाळा कोरगावकर, तलाठी अरसकर, कृषिसेवक सरंबळकर, शेतकरी बाबा तेली, सुदन तेली, राजेश शेलटे आदींसह शिवसेना कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.