राजकिय वर्तुळात चर्चेला उधाण
ऑनलाईन टीम / तरुण भारत
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस हा पक्ष भारतातील सर्वात जुना राजकिय पक्ष आहे. यामुळे राष्ट्रीय काँग्रेस हा कानाकोपऱ्यात पोहोचला असुन मात्र गेल्या काही दिवसात राष्ट्रीय काँग्रेसची स्थिती पाहता आपल्या कामगिरीने मतदाराला अपेक्षित काय आहे. आणि आपला पक्ष त्यासाठी करु शकतो ? यावर चिंतन बैठका होणे अपेक्षित असताना काँग्रेसचा अध्यक्ष कोण ? हा प्रश्न गेले कित्येक दिवस सुटलेला नाही. अशा वातावरणात काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांना पद्मभूषण पुरस्कार मिऴाला यावेऴी त्यांनी दिलेल्या प्रतिक्रियेचे राजकीय पार्श्वभूमीवर वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत.
पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसला पराभव पत्करावा लागल्यानंतर बंडखोर जी-२३ गटाकडून पुन्हा एकदा पक्षनेतृत्व आणि पक्षातील बदलांविषयी उघड नाराजी व्यक्त करायला सुरुवात केली आहे. या पार्श्वभुमीवर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी गटाचे सदस्य गुलाम नबी आझाद यांची भेट घेऊन गुंता सोडवण्याचा प्रयत्न केला होता. तसेच गुलाम नबी आझाद यांना देशाच्या सर्वोच्च पुरस्कारांपैकी एक असलेल्या पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.
पद्मभूषण मिळाल्यानंतर गुलाम नबी आझाद यांनी आपल्या कामाची कुणीतरी दखल घेतंय, हे पाहून आनंद झाल्याची प्रतिक्रिया दिली आहे. यातुन वेगवेगळे अर्थ काढले जात असुन हा रोख त्यांनी काँग्रेसलाच लगावला आहे का ? कारण आझाद यांच्या कामाची राष्ट्रीय काँग्रेसने दखल घेतली नाही अस म्हणायचं आहे का ? अथवा भाजप सरकारने आपल्या कामाची आता दखल घेतली असा ही अर्थ यातुन ध्वनीत होऊ शकतो. म्हणुनच आझाद यांच्या वक्तव्याची राजकिय वर्तुळात चांगलीच चर्चा सुरु आहे.
यावेळी बोलताना आझाद म्हणाले कि माझ्या आयुष्यात अनेक चढ-उतार आले. पण या काळात देखील मी कायमच लोकांसाठी काम करण्याचा प्रयत्न केला. मग ते सामाजिक क्षेत्र असो किंवा राजकीय क्षेत्र असो किंवा मग अगदी जम्मू-काश्मीरचा माजी मुख्यमंत्री म्हणून असो”, असं देखील ते म्हणाले. मात्र केंद्र सरकार व देशाच्या जनतेकडून मला पुरस्कार मिळाल्याचा आनंद होत आहे”, असं त्यांनी यावेळी नमूद केलं.