वार्ताहर/ कुद्रेमनी
येथील बलभीम साहित्य संघाच्यावतीने यंदाचे मराठी साहित्य संमेलन रविवार दि. 31 जानेवारी रोजी साधेपणाने आयोजित करण्याचा निर्णय साहित्य संघाच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत घेण्यात आला आहे. संघाची बैठक नुकतीच झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी साहित्य संघाचे अध्यक्ष एम. बी. गुरव होते.
बैठकीच्या प्रारंभी ग्राम पंचायत माजी सदस्य नागेश राजगोळकर यांनी प्रास्ताविक करून उपस्थितांचे स्वागत केले.
कोरोनामुळे सर्व नियमांचे पालन करून साधेपणाने संमेलनाचे नियोजन करण्याबाबत यावेळी चर्चा झाली.
यावेळी शिवाजी शिंदे, राजू राजगोळकर, मोहन शिंदे, गणपती धामणेकर, रवि पाटील, राम गुरव, शैलेश गुरव, दीपक मराठे, उमेश गुरव, बी. एन. पाटील, दत्तू कांबळे, बाबाजी गुरव, महादेव गुरव, अनंत लोहार, पी. एस. गुरव, शांताराम गुरव, सुशांत शिंदे, शेखर मजुकर, विशाल गुरव, मारुती गुरव आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. मोहन शिंदे यांनी आभार मानले.