येनकेनप्रकारे जगभरात आपला विस्तार करायचा या विचाराने पछाडलेल्या चीनने भारताबरोबरच्या कुरापती चालूच ठेवल्या आहेत. आता पँगाँग तलावाजवळ पुलाचे बांधकाम सुरू करून स्वतःच्या सैन्याच्या हालचालीला बळ देण्याचे प्रयत्न चालवले आहेत. जिओ इंटलिजन्स तज्ञ डॅमियन सिमॉन यांनी चीनच्या बांधकामाचे पुरावे जाहीर दिले आहेत. हे काम चीनने स्वतःच्या हद्दीत सुरू केले असले तरी भारताच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने त्याची गंभीर दखल घेणे आवश्यक आहे. जगभर आपले हातपाय पसरायचे ही चीनची नीती आहे. त्यासाठी कोणत्याही मार्गाचा चीन अवलंब करतो. भारताच्या सीमेलगतचा भूभाग चीनने आक्रमण करून गिळंकृत केलेला आहे. शेजारी देश म्हणून आपल्याला सबुरीने घ्यावे लागत असले तरी अगतिक होऊन चालणार नाही. एकीकडे अमेरिकेसारख्या बलाढ्य़ शक्तीला आव्हान द्यायचे आणि जगातील छोटय़ा-मोठय़ा देशांशी निरनिराळय़ा पद्धतीने संबंध वाढवायचे, त्यांना अंकित ठेवण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजे, आपल्याशी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरून संघर्ष सुरू आहे, पण श्रीलंका, तैवान, युगांडा, मालदीव, हाँगकाँग, भूतान, लिथुआनिया या देशांनाही जेरीस आणण्याचे प्रयत्न चीनने केले आहेत. श्रीलंकेशी जवळीक साधून, गोड बोलून चीनने त्यांना कर्ज दिले. ती रक्कम 37 हजार कोटी रूपयांवर गेली. आता त्याच्या वसुलीचा तगादा लावताना आपल्या अटी कडक केल्या आहेत. श्रीलंकेत महागाई प्रचंड वाढली आहे, व्यापारी-उद्योजकांनी वाट्टेल त्या भावाने विक्री सुरू केली आहे. तिथल्या सरकारला त्यावर नियंत्रण ठेवणे अवघड झाले आहे. परकीय चलनाचा तुटवडा असताना श्रीलंका चीनचे कर्ज कसे फेडणार हा गुंतागुंतीचा प्रश्न आहे. मालदीवसारख्या छोटय़ा देशालाही जाचक अटी घालून कर्ज दिले आहे. ते व्यावसायिक करारानुसार असल्याने त्याचा व्याजदरही जास्त आहे. पर्यटन हा एकच मोठा व्यवसाय असणाऱया मालदिवची त्यामुळे पंचाईत झाली आहे. युगांडाला असेच कर्जबाजारी करून त्यांनी त्रस्त केले. कर्ज फिटण्याची कोणतीही शक्मयता निर्माण होऊ द्यायचीच नाही असा डाव रचून युगांडाच्या विमानतळावर चीनने कब्जा केला आहे. लिथुआनिया देशाने चीनचा हा कावेबाजपणा ओळखला. तिथल्या अनेक कंपन्यांशी करार करून चीनने कर्ज दिले आहे. पण हा देश जागरूक आहे. त्यांनी चीनला शह देण्याचा प्रयत्न चालवला आहे. तैवानची अवस्था तर बिकट आहे. आता हाँगकाँगमध्येही चीनला मानणाऱयांचेच सरकार आले आहे. विशेष म्हणजे, आपल्या विरोधकांना निवडणुकीत उमेदवारीच मिळू नये, अशी तरतूद करुन ठेवली होती. 2019 मध्ये तिथे राष्ट्रीय सुरक्षा कायदा लागू करण्यात आला होता. विरोधकांची गळचेपी करण्यासाठी त्यांची धरपकड करण्यात आली. त्यामुळे हाँगकाँगमध्ये चीनसमर्थकांमध्येच निवडणूक लागली आणि अपेक्षेप्रमाणे सत्तेवर येणारे कोणीही असले तरी ते आपलीच पालखी वाहतील, याची काळजी घेतली गेली. भूतानचा काही भाग चीनने गिळला आहे. तिथे 2020 मध्ये त्यांनी गाव वसवले आहे. तिबेटमध्ये तर अनेक गावे वसवून पायाभूत सुविधाही निर्माण केल्या आहेत. चीनचा हा विस्तारवाद सगळय़ा जगाला भारी पडत आहे. भारतामध्ये अतिशय स्वस्त दराने चिनी वस्तूंची विक्री करून बाजार काबीज करण्याचा डाव आहे. अगदी, विविध राज्यांमध्ये व्यापार-उद्योगासाठी उतरण्याचे चीनचे प्रयत्न यशस्वी होत आहेत. रंगपंचमीच्या पिचकाऱया किंवा अगदी गणेशोत्सवातील श्री गणेशाच्या मूर्ती, रोषणाईसाठीच्या विद्युतदिव्यांच्या माळा, ऊबदार कपडे, चष्म्याच्या प्रेमपासून पायातील वहाणांपर्यंत सर्व वस्तूंच्या निर्मितीमध्ये चीन उतरला आहे. आपल्या उत्पादनांची किंमत आरंभी अत्यंत स्वस्त ठेवायची, त्यामुळे स्थानिक बाजार गडगडणार. नाईलाजाने स्थानिक विपेते चीनी वस्तू विकत राहणार आणि एकदा ‘मोनॉपॉली’ निर्माण झाली की आपले खरे रूप प्रकट करायचे अशी ही व्यूहरचना आहे. बाजार ताब्यात आल्यावर कोणतीही गोष्ट सहजसाध्य होते, हे त्यांना ठाऊक आहे. इंग्रजांनीही आपल्या देशात हातपाय पसरण्यासाठी आधी व्यापारी असल्याचीच बतावणी केली होती. ‘व्यापारी म्हणून आले आणि राज्यकर्ते बनले’, असे त्यांच्याविषयी सांगितले जाते. भारताबरोबर उघड युद्ध पुकारणे सध्याच्या स्थितीत कठीण असल्याचे चीनच्या लक्षात आले आहे. पूर्वी आपण चीनकडून पराभव पत्करला असला तरी आता स्थिती वेगळी आहे. ऑगस्ट 2020मध्ये भारताने पँगाँग तलावाजवळ मोठ्य़ा संख्येने आपले सैनिक तैनात करून त्यांना त्याची चुणूक दाखवली होती. त्यामुळे एकीकडे चर्चा करत असल्यासारखे दाखवायचे आणि दुसरीकडे, सतत कोणत्या ना कोणत्या कुरापती काढायच्या असे प्रकार चीनकडून सुरू आहेत. लडाखच्या गलवान खोऱयात उभय देशांमध्ये चांगलाच संघर्ष झाला होता. भारताचे काही जवान मारले गेले, त्याच्या दुप्पट चिनी सैनिक आपण मारले. त्यावेळीही चीनला आपल्याकडून चांगली समज मिळाली होती. त्यानंतर गलवान खोऱयात चीनी ध्वज फडकावून आक्रमकता दाखवली गेली. अरुणाचल प्रदेशातील 15 ठिकाणांना चीनी भाषेत नावे देऊन आगळीक केली आहे. छोटय़ामोठय़ा कुरापती करायच्या. भारताची ताकद अशा संघर्षाशी लढण्यात खर्च होईल असे पाहायचे आणि आपली विस्ताराची भूमिका जोरकसपणे दामटायची हे चीनचे डावपेच आहेत. लडाख आणि हिमालयीन प्रदेशात सतत राहून चीनच्या सैनिकांचे आरोग्य ढासळले आहे. रोबो सैनिक तयार करण्याचा इरादाही चीनने राखला आहे. भारतात सक्षम सरकार कार्यरत असले तरी विरोधकांना सत्ताधाऱयांवर शाब्दीक आक्रमणासाठी कुमक मिळेल याची दक्षता चीन घेत आहे. भारत आणि चीनची सीमारेषा निश्चित होत नाही. ती लवकर होऊ द्यायची नाही, चर्चेत वेळकाढूपणा करायचा प्रकार चीन करत आहे. कोरोनासारख्या महामारीच्या पार्श्वभूमीवर आपल्या देशातील जनतेच्या आरोग्याची काळजी घेण्यात भारत सरकार मग्न आहे. तरीही जशास तसे उत्तर देण्याची ताकद भारतामध्ये आहे, इतकेच नव्हे तर जागतिक पटलावर भारताच्या भूमिकेचे समर्थनच केले जात आहे हे चीनला ठाऊक आहे. कुरापती करून भारताची ताकद क्षीण होईल, असा आशावाद त्यांना वाटतोय.
Previous Articleदिव्यांग मुलाला पाठीवर घेत जगभ्रमंती
Next Article सेबीची नोटीस व्हॉट्सऍप-टेलिग्रामवर
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.