ऑनलाईन टीम / इस्लामाबाद :
पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारताचे माजी लष्करी अधिकारी कुलभूषण जाधव यांनी आपल्या शिक्षेवर फेरविचार याचिका दाखल करण्यास नकार दिल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे.
हेरगिरीच्या आरोपाखाली कुलभूषण हे पाकिस्तानमध्ये अटकेत असून, त्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 17 जून रोजी पाकिस्तानचे अतिरिक्त ॲटर्नी जनरल यांनी त्यांच्या शिक्षेच्या विरोधात फेरविचार याचिका दाखल करण्यास सांगितले होते. मात्र, त्यासाठी कुलभूषण यांनी नकार दिल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे.
पुनर्विचार याचिका दाखल करण्याऐवजी कुलभूषण यांनी दया याचिकेची मागणी केली आहे, असेही पाकचे म्हणणे आहे.