प्रतिनिधी / बेळगाव
‘परीक्षेला हवे तर बसा नाही तर सोडा’ या राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या कुलसचिवांनी दिलेल्या अरेरावीच्या उत्तराची दखल अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने घेतली. परिषदेचे शहर सचिव रोहित उमनाबादीमठ यांनी सोमवारी सकाळी भुतरामहट्टी येथे जाऊन विद्यापीठामध्ये कुलगुरुंची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले.
सध्याच्या काळात विद्यार्थ्यांचे मनोधैर्य वाढविण्याची गरज असताना अशा पद्धतीचे उत्तर कुलसचिवांनी देणे पूर्णतः चुकीचे आहे. काही विद्यापीठांनी विद्यार्थ्यांना हॉस्टेल सोडून जाण्यास सांगितले आहे. आधी संपामुळे व नंतर कोरोनामुळे विद्यार्थ्यांसमोर अनेक समस्या आहेत. अशावेळी विद्यार्थ्यांच्या हिताच्यादृष्टीने परीक्षा पुढे ढकलाव्यात आणि विद्यार्थ्यांचे नैतिक धैर्य खचणार नाही, यासाठी प्रयत्न करावेत, असे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.