क्रीडा प्रतिनिधी / बेळगाव
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताला नवीन घटना लिहून दिली. त्यांचाच आदर्श घेऊन आपला देश पुढे चालला आहे. त्यांचे विचार सध्याच्या पिढीने जोपासले पाहिजेत, असे उद्गार महामानव, विश्वभारत, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष एस. आय. सनदी यांनी काढले.
कुस्तीगीर संघटनेतर्फे त्यांची जयंती साजरी करण्यात आली. अध्यक्ष एस. आय. सनदी यांनी भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घातला. यावेळी सल्लागार पी. बी. कुरडे, देवरमनी, के. एम. कोकणे, मजिद मुल्ला, बी. जी. पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
दरवषी आंबेडकर जयंतीनिमित्त बेळगावात भव्य कुस्ती मैदानाचे आयोजन करण्यात येते. पण गेली दोन वर्षे कोरोना महामारीमुळे कुस्ती मैदाने रद्द करण्यात आली. पुढील वषी कोरोना आटोक्मयात आल्यानंतर पुन्हा कुस्ती मैदान भरविण्याची इच्छा कुस्तीगीर संघटनेने व्यक्त केली. पी. बी. कुरडे यांनी आभार मानले.