प्रतिनिधी /बेळगाव
शहरातील पाणी नियोजनाचा कारभार एल ऍण्ड टी कंपनीकडे सोपविल्यानंतर पाणीपुरवठय़ाबाबत अनेक ठिकाणी तक्रारी होत आहेत. शहरातील विविध भागातील कूपनलिका नादुरुस्त झाल्या असून दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे कोनवाळ गल्ली येथील रहिवाशांनी एल ऍण्ड टी कंपनीच्या कार्यालयात धाव घेऊन समस्येचे निवारण करा, अशा मागणीचे निवेदन माजी महापौर सरिता पाटील यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले.
चोवीस तास पाणीपुरवठा योजनेच्या अंमलबजावणीसाठी पाणीपुरवठा नियोजनाचे हस्तांतरण एल ऍण्ड टी कंपनीकडे करण्यात आले. मागील तीन महिन्यांपासून पाणीपुरवठा नियोजनाचे कामकाज कंपनीकडून करण्यात येत आहे. मात्र काही ठिकाणी कूपनलिकाद्वारे पाणीपुरवठा केला जातो. तेथील कूपनलिका नादुरुस्त आहेत. कोनवाळ गल्ली परिसरात पाणीपुरवठा करणारी कूपनलिका चार-पाच महिन्यांपासून बंद आहे. याबाबत एल ऍण्ड टी कंपनीकडे तक्रार करण्यात आली होती. पण याची दखल घेण्यात आली नाही. पाणीपुरवठा मंडळाकडे कारभार असताना कूपनलिकेची पाहणी करून दुरुस्तीसाठी अधिकाऱयांना सूचना करण्यात आली होती. पण जुलैपासून पाणीपुरवठा विभागाचे कामकाज हस्तांतर केल्यानंतर कूपनलिकेच्या दुरुस्तीचे काम रखडले आहे. त्यामुळे सदर कूपनलिकेची दुरुस्ती करावी, या मागणीसाठी कोनवाळ गल्ली येथील रहिवाशांनी एल ऍण्ड टी कंपनीच्या कार्यालयात जाऊन तक्रार नोंदविली.
तसेच माजी महापौर सरिता पाटील यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देऊन कूपनलिकेची दुरुस्ती करून पाणीसमस्येचे निवारण करावे, अशी विनंती करण्यात आली. पाणीपुरवठय़ात व्यत्यय निर्माण झाल्यास कूपनलिकेच्या पाण्याचा वापर केला जातो. त्यामुळे सदर कूपनलिका बंद असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. यासाठी कूपनलिकेची दुरुस्ती करण्याची विनंती करण्यात आली. यावेळी शांता मेलगे, वीणा सूर्यवंशी, शंकर जेलुगडेकर, विनायक बेळगावकर, देवू कटांबळे, रेखा किल्लेकर, अनंत कडोलकर आदींसह नागरिकांच्या निवेदनावर सहय़ा होत्या.