प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
नारळी पौर्णिमेला रविवारी जिल्हाभरात समुद्र, नद्या आणि तलावांमध्ये नारळ अर्पण करण्यात आले. जिल्हय़ात अनेक ठिकाणच्या उत्सवांना ऐतिहासिक परंपरा आहे. मात्र, यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साधेपणाने उत्सव साजरा करण्याकडे कल होता. अनेक मच्छीमारांनी या दिवशी समुद्रात नौका लोटण्याचा मृहूर्त साधला. सावंतवाडीत खेमसावंत भोसले यांनी मोती तलावात नारळ अर्पण केला.
शेकडो वर्षांची ऐतिहासिक परंपरा जोपासत, दरवषी हजारो नागरिकांच्या उपस्थितीत साजरा होणारा मालवणचा नारळी पौर्णिमा उत्सव गतवषीप्रमाणे यंदाही साधेपणाने साजरा करण्यात आला. परंपरा जोपासत तसेच कोरोना खबरदारीचे नियम पाळून उत्सव साजरा झाला. सायंकाळी 4 वाजता किल्ले सिंधुदुर्ग येथून सागराला श्रीफळ अर्पण केल्यानंतर मालवण व्यापारी संघाचे अध्यक्ष उमेश नेरुरकर यांच्या हस्ते सोनेरी मुलामा दिलेले श्रीफळ (नारळ) पूजा करून सागराला अर्पण करण्यात आले. नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, नगरसेवक नितीन वाळके, नितीन तायशेटे, रवींद्र तळाशीलकर, गणेश प्रभुलीकर, अशोक सावंत, मोहन शिरसाट, रत्नाकर कोळंबकर, परशुराम पाटकर, दिलीप हिर्लोस्कर, राजू नेरुरकर, विजय केनवडेकर, नंदू गवंडी, विजय नेमळेकर, बाळा आचरेकर, अंजना सामंत, महेश करमळकर, हर्षल बांदेकर आदी व्यापारी प्रतिनिधी उपस्थित होते. कोरोनाचे संकट लवकर दूर करण्याचे साकडे सागराला घालण्यात आले.
पोलीस निरीक्षक एस. एस. ओटवणेकर यांनीही सागराला श्रीफळ अर्पण केले. मच्छीमार बांधवांनीही किनारपट्टीवरून सागराला श्रीफळ अर्पण करत नव्या मासेमारी हंगामाचे साकडे दर्याराजाला घातले.
वेंगुर्ल्यात उत्साह
वेंगुर्ले बंदर येथे नारळी पौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. नागरिकांबरोबरच येथील पोलीस ठाण्याचा मानाचा सोन्याचा नारळ वेंगुर्ले पत्रकार संघ आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातर्फे एकाचवेळी समुद्राला नारळ अर्पण करण्यात आला. गतवषी कोरोनामुळे हा सण अगदी मोजक्मयाच नागरिकांच्या उपस्थितीत झाला होता. यावषी अनलॉकमुळे साजरा करता आला. यावेळी वेंगुर्ले पोलीस ठाण्यातर्फे पोलीस निरीक्षक तानाजी मोरे, वेंगुर्ले तालुका पत्रकार समितीतर्फे अध्यक्ष प्रदीप सावंत, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा सदस्य नितीन कुबल यांनी नारळाचे विधीवत पूजन करून तो अर्पण केला.
यावेळी महिला पोलीस उपनिरीक्षक रुपाली गोरड, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सचिन सावंत, शेखर दाभोलकर, हवालदार वासुदेव परब, पोलीस नाईक रुपा वेंगुर्लेकर, गौरव परब, नितीन चोडणकर, विठ्ठल धुरी, कॉन्स्टेबल मनोज परुळेकर, राहुल बरगे, बंटी सावंत, अमर कांडर, पूजा भाटे, सुरज रेडकर तसेच पत्रकार समितीचे के. जी. गावडे, भरत सातोसकर आदी उपस्थित होते. शहरातील नागरिकांनीही समुद्राला नारळ अर्पण केला.