प.महाराष्ट्रात 12.50 लाख शेतकऱयांना फायदा
प्रतिनिधी / कोल्हापूर
कृषिपंपाच्या वीजबिलांमधून थकबाकीमुक्त होण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातील 12 लाख 50 हजार शेतकऱयांच्या मूळ थकबाकीमधील 2644 कोटी 77 लाख रुपये माफ केले आहेत. या शेतकऱयांनी चालू वीजबिल व सुधारित थकबाकीपैकी 50 टक्के रकमेचा मार्चपर्यंत भरणा केल्यास आणखी तब्बल 4 हजार 3 कोटींची माफी मिळणार आहे. वीजबिलांच्या थकबाकीमुक्ती योजनेत सहभाग नाही व चालू वीजबिलांचा देखील भरणा केलेला नाही, अशा शेतकऱयांच्या कृषिपंपांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई करण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱयांनी किमान चालू वीजबिलांचा भरणा करावा, असे आवाहन केले आहे.
ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या संकल्पनेतून कृषिपंप वीजजोडणी धोरणातून कृषिपंप वीजबिलांच्या थकबाकीमुक्तीसाठी सुमारे 66 टक्के सूट देण्यात येत आहे. या योजनेत पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर व सोलापूर जिह्यातील 12 लाख 50 हजार 685 शेतकऱयांकडे 10 हजार 841 कोटींची मूळ थकबाकी होती. त्यातील 2644 कोटी 77 लाख रुपये महावितरणकडून निर्लेखनद्वारे सूट तसेच विलंब आकार व व्याजातील सूटद्वारे माफ केले आहे. बिलांच्या दुरुस्तीद्वारे 189 कोटी 68 लाख रुपये समायोजित केले आहेत. आता या शेतकऱयांकडे 8007 कोटींची सुधारित थकबाकी आहे. मार्चपर्यंत त्यातील 50 टक्के म्हणजे 4 हजार 3 कोटी 50 लाख रुपये व चालू वीजबिलांचा भरणा केल्यास उर्वरित 4 हजार 3 कोटी 50 लाख रुपये देखील माफ करण्यात येणार आहे.
पुणे, सातारा, सोलापूर, सांगली व कोल्हापूर जिह्यातील 5 लाख 52 हजार 276 शेतकऱयांनी वीजबिल थकबाकीमुक्तीच्या योजनेत सहभाग नोंदवला आहे. त्यांनी 359 कोटी 27 लाखांचे चालू वीजबिल व 409 कोटी 95 लाख रुपयांच्या सुधारित थकबाकीचा भरणा केला आहे. या सर्व शेतकऱयांचे धोरणानुसार व्याज व दंड माफी, निर्लेखनाची सूट तसेच वीजबिल दुरुस्ती समायोजन आणि 50 टक्के थकबाकी माफीचे 1452 कोटी 70 लाख रुपये माफ केले आहेत.
ग्राहकांकडे बिलांची थकबाकी मोठÎा प्रमाणात वाढत असल्याने महावितरण सद्यस्थितीत अत्यंत कठीण संकटात आहे. त्यामुळे शेतकऱयांनी कृषिपंपाच्या चालू वीजबिलांची रक्कम भरणे आवश्यक आहे. योजनेत सहभाग नाही, चालू वीजबिलांचा भरणा नाही अशा शेतकऱयांच्या कृषिपंपाचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई करण्यात येत आहे.
1 लाख 80 हजार शेतकऱयांचे वीजबिल झाले कोरे
या योजनेचा लाभ घेत पश्चिम महाराष्ट्रातील 1 लाख 80 हजार 522 शेतकरी वीजबिलांच्या थकबाकीमधून मुक्त झाले. या शेतकऱयांकडे 561 कोटी 99 लाख रुपयांची सुधारित थकबाकी होती. त्यांनी 95 कोटी 12 लाख रुपये चालू वीजबिल व 50 टक्के थकबाकीचे 281 कोटींचा भरणा केला व वीजबिल कोरे केले. यात उर्वरित 50 टक्के थकबाकीचे 281 कोटी रुपये माफ केले आहेत. या योजनेतून बारामती परिमंडलातील 83 हजार 576, कोल्हापूर परिमंडल 83 हजार 192 व पुणे परिमंडलातील 13 हजार 754 शेतकरी थकबाकीमुक्त झाले आहेत.
बारामती परिमंडलातील 7 लाख 38 हजार 277 शेतकऱयांच्या मूळ थकबाकीमधील निर्लेखन, व्याज व दंड माफी व समायोजनेद्वारे 2319 कोटी 40 लाख रुपये माफ केले. सुधारित थकबाकीमधील 5832 कोटी 72 लाखांपैकी 50 टक्के रकमेचा मार्चपर्यंत भरणा केल्यास थकबाकीचे उर्वरित 50 टक्के म्हणजे 2916 कोटी 36 लाख रुपये माफ होणार आहेत. पुणे परिमंडलामधील 1 लाख 25 हजार 799 शेतकऱयांचे 180 कोटी 73 लाख रुपये माफ करण्यात आले असून 743 कोटी 75 लाखांच्या सुधारित थकबाकीपैकी 50 टक्के रक्कम व चालू वीजबिल भरल्यास उर्वरित 371 कोटी 87 लाख रुपये माफ होणार आहेत. कोल्हापूर परिमंडलामधील 3 लाख 86 हजार 609 शेतकऱयांचे 334 कोटी 33 लाख रुपये माफ करण्यात आले असून 1488 कोटी 19 लाखांच्या सुधारित थकबाकीपैकी 50 टक्के रक्कम व चालू वीजबिल भरल्यास उर्वरित 744 कोटी 9 लाख रुपये माफ होणार आहेत.