सुधारणांवर होऊ शकते चर्चा-निर्णय
प्रतिनिधी/ वास्को
केंद्र सरकारने शेतकऱयांच्या हितासाठी अमलात आणलेले कायदे मागे घेणे शक्य नाही. कायदय़ात काही सुधारणा करण्याचे प्रस्ताव असतील तर त्यावर आवश्यक चर्चा होऊ शकते. कायदे करून ते मागे घेणे सुरू केल्यास जनतेचाही कायदय़ांवरील विश्वास उडेल, असे स्पष्ट करून केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण खात्याचे मंत्री व भारतीय रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी शेतकऱयांचे कायदे मागे घेण्याची मागणी करणाऱयांना फटकारले.
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी वास्कोत घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले की या प्रश्नावर दिल्लीत चालू असलेल्या आंदोलनाची दखल घेऊन केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी आंदोलकांशी सात ते आठ वेळा चर्चा केलेली आहे. शेतकऱयांना या कायदय़ात काही सुधारणा व्हाव्यात, असे वाटत असल्यास तसे प्रस्ताव आणले जाऊ शकतात. चर्चाही होऊ शकते. मात्र जे कायदे पूर्णविचाराअंती संसदेत संमत झालेले आहेत ते मागे घेणे शक्य होणार नाही असे आठवले यांनी स्पष्ट केले.
या कायदय़ांमुळे देशाचे संविधान व लोकशाही धोक्यात येईल असे म्हणणे चुकीचे आहे. कुणीही उद्योगपती कुठल्याही शेतकऱयाची जबरदस्तीने जमीन विकत घेण्याचाही कोणताही धोका नाही. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल आदर आहे. त्याबाबत त्यांची ख्याती आहे. भारतीय संविधानाबाबत त्यांना आदर आहे. संविधान बदलण्याचाही प्रश्न येत नाही, असेही मंत्री आठवले म्हणाले.
एकही खासदार नसताना गोरगरीबांच्या सेवेची मोदींनी दिली संधीभारतीय रिपब्लीकन पार्टी भाजपासोबत आहे. मागच्या आणि आताच्या सरकारमध्ये आपण मंत्रीपद भूषवीत असून आपल्या पक्षाचा एकही खासदार नसताना मोदी सरकारने गोरगरीबांची सेवा करण्याची संधी मला दिलेली आहे. या संधीचा लाभ देशातील जनतेला व्हावा यासाठी आपल्या मंत्रालयातर्फे विविध योजना राबविल्या जात आहे असे सांगून त्यांनी देशात व गोवा राज्यातही सामाजिक न्याय व सक्षमीकरण खात्यातर्फे सामाजिक विकासासाठी दिलेल्या योगदानाची माहिती मंत्री आठवले यांनी दिली.
गोव्यात आंबेडकर भवनासाठी मुख्यमंत्री सकारात्मक
आपण गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेऊन त्यांच्याकडे सामाजिक सुधारणा, वृध्दाश्रम, मुलांसाठी आश्रम, दिव्यांग व इतर गरजूसाठी प्रकल्प उभारण्याच्या कामात आपल्या मंत्रालयातर्फे मदतीची तयारी दाखवलेली आहे, असे सांगून मुख्यमंत्र्यांनी गोव्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन उभारण्यासाठी पणजीतच जमीन उपलब्ध करण्याचे आश्वासन दिलेले असून ते याबाबत सकारात्मक असल्याचे सांगितले.
विधानसभेसाठी दोन जागा सोडण्याची मागणी भाजपाकडे करणार
आपला पक्ष भाजपाचा सहकारी पक्ष आहे. मागच्या विधानसभा निवडणुकीत गोव्यात भाजपाने दोन जागा भारतीय रिपब्लीकन पार्टीला देण्याची विनंती आपण केली होती. मात्र, ती मान्य झाली नव्हती. येणाऱया विधानसभेसाठी आपली ही मागणी कायम असणार आहे. आपण मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे यासंबंधी बोललो आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जी.पी. नड्डा यांचीही भेट घेऊन आपण गोव्यातील जागांबाबत त्यांच्याकडे बोलणी करेन असे मंत्री आठवले म्हणाले.
जनहिताच्या विकासाला कुणी विरोध करू नये
गोव्यातील रेल्वे दुपदरीकरण विरोधी आंदोलनाविषयी बोलताना आठवले म्हणाले की, विरोध करण्याचा अधिकार प्रत्येक नागरिकाला आहे. मात्र, सर्वच प्रकल्पांना विरोध होऊ लागला तर विकास करणे शक्य होणार नाही. प्रकल्प जनहिताचे असतील, रोजगार उपलब्ध करणारे असतील तर त्याला सहकार्य करायला हवे. असे प्रश्न योग्य नुकसान भरपाई देऊन सोडवायला हवे. दुनिया आज गतीने पुढे जात आहे. आम्ही मागे पडू नये याची काळजी घ्यायला हवी. विकासाला विरोध कुणी करू नये असा सल्ला केंद्रीयमंत्री आठवले यांनी दिला.