बेळगाव :/ प्रतिनिधी
शेतकऱयांचे आंदोलन प्रदीर्घ काळ चालूच आहे. नवीन कृषी कायदा तातडीने रद्द करावा अशी शेतकऱयांची मागणी आहे. या मागणीकडे केंद्र सरकार साफ दुर्लक्ष करत आहे. भारत देश हा कृषी प्रधान देश म्हणून मानला जातो. देशाच्या माजी पंतप्रधानांनी ‘जय जवान जय किसान’ चा नारा लावला आहे. त्या नाऱयारा आता केंद्र सरकारचे दुर्लक्ष झाले आहे. नवीन कृषी कायदा रद्द करावा आणि शेतकऱयांना न्याय द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे मुनीर लतिफ यांनी केली आहे.
तसेच दिवसेंदिवस पेट्रोल, डिझेलचे दर वाढत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य अडचणीत आले आहे. आधीच कोरोनामुळे आर्थिक घडी विस्कटली आहे. त्यामुळे वाढलेले पेट्रोल व डिझेलचे दर शासनाने तातडीने नियंत्रणात आणावे व जनतेला दरवाढीपासून मुक्ती द्यावी, शिवाय घरगुती गॅस सिलिंडरचे दर देखील वाढले असून ते देखील कमी करावेत,