केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करताना आमचे सरकार शेतकऱयांना समर्पित असल्याचं सांगत हमीभावाबद्दल भाष्य केले. आमचे सरकार शेतकऱयांना समर्पित असल्याचे सांगत संपुआ सरकारच्या तुलनेत तीन टक्के जास्त निधी मोदी सरकारने शेतकऱयांच्या खात्यात जमा केला आहे. प्रत्येक क्षेत्रातील शेतकऱयाला मोदी सरकारकडून मदत दिली गेली. तांदूळ, गहू, डाळींसह इतर शेतमालांच्या हमीभावात वाढ करण्यात आली. शेतमालाच्या खरेदीसाठीचे प्रोत्साहन वाढवण्यात येत आहे आणि शेतकऱयांना लाभ दिला जात आहे. 2021-22 या आर्थिक वर्षांसाठी कृषी कर्जाची उद्दिष्ट 16.6 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढवण्यात आले आहे. त्याचबरोबर 1 हजार कृषी बाजार ‘ई-नाम’शी जोडण्यात येणार आहे. कृषी क्षेत्रातील पायाभूत सुविधा उभारण्यासाठी 40 हजार कोटीपर्यंत निधी वाढवण्यात आला आहे. त्याचबरोबर सूक्ष्म जलसिंचनासाठी निधी दुप्पट करण्यात आला आहे,’’ असे सीतारामन म्हणाल्या.
Previous Articleसमाज माध्यमे कायद्याच्या कक्षेत आणा
Next Article भारत-अर्जेंटिना महिला हॉकी सामना बरोबरीत
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.