वृत्तसंस्था/ मुंबई
कृषी व प्रक्रिया खाद्य निर्यातीमध्ये भारताला नुकताच यशस्वी टप्पा गाठता आला आहे. गेल्यावषी एप्रिल ते डिसेंबरच्या कार्यकाळामध्ये कृषी व प्रक्रिया खाद्य निर्यातीमध्ये समान कालावधीच्या तुलनेमध्ये 20 टक्के इतकी वाढ झाली असल्याची माहिती आहे.
मागच्या वषी भारतासह इतर देशांनीही निर्यातीमध्ये लक्षणीय वाटा उचलला असल्याची बाब या ठिकाणी स्पष्ट करण्यात आली आहे. प्रक्रिया खाद्याच्या निर्यातीसाठी ट्रेड प्रोमोशन कौन्सिल ऑफ इंडिया ही संघटना मदत करते आहे. मागच्या वषी कोरोना लाटेच्या कठीण काळातही निर्यातीमध्ये जास्त चांगली कामगिरी निभावता आली असल्याचेही यावेळी सांगण्यात आले आहे. अनेक आव्हानांना सामोरे जाऊन निर्यातीचे लक्ष साध्य करण्यासाठी आवश्यक ते परिश्रम घेतले जात आहेत. म्हणूनच एप्रिल ते डिसेंबरच्या (2021-22) कालावधीमध्ये कृषी व प्रक्रिया खाद्य उत्पादनांच्या निर्यातीमध्ये 20 टक्के इतकी लक्षणीय वाढ नोंदवता आली आहे.
मागच्या आठवडय़ामध्ये ग्रेटर नोएडा येथे भरवण्यात आलेल्या पाचव्या प्रदर्शनामध्ये अंदाजे 1 अब्ज डॉलर्सच्या निर्यातीची ऑर्डर प्राप्त झाली आहे. ही सर्व ऑर्डर प्रक्रिया खाद्य आणि बेवरेजेस गटामध्ये दिसली आहे. परंतु दिल्लीमध्ये कोरोनाचे प्रमाण वाढल्याच्या कारणाने निर्बंधाचा परिणाम निर्यातीच्या ऑर्डरवर दिसून आला. सदरच्या प्रदर्शनात इंग्लंड, युरोप, अमेरिका यासारख्या देशातील खरेदीदारांना भाग घेता आला नाही.